अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण वाया घालवू नका – मा. शौमिका महाडिक, अध्यक्षा  जि प कोल्हापूर

7  ए्‌प्रिल 2018 रोजी जागतिक आरेाग्य दिना निमित्त आरोग्य देवता धन्वंतरी प्रतिमेचे पुजन मा शैमिका अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कुणाल खेमनार उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना मा. अध्यक्षा म्हणाल्या की,  अन्नाचा कण आणि  आनंदाचा क्षण वाया  घालवू नका. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी या प्रसंगी बोलतांना म्हणाले की, आरोग्य विभागाने राष्ट्रीय मानांकन अनेक प्रा.आ.केंद्रासाठी प्राप्त केले आहे. तसेच प्रधानमंत्री  सुरक्षित मातत्व योजना,  प्रधानमत्री मातृवंदन योेजना ,  बेटी बचाव बेटी पढाव मध्ये चांगले काम केले आहे असे नमुद केले.

प्रास्ताविक डॉ उषादेवी कुभांर जि.आ.अ यानी केले या प्रसंगी बोलतांना जागतीक आरोग्य दिनांचे घोषवाक्य आहे- “Universal Health Coverage : Every One, Every Where.  त्यांचा मराठी अनुवाद आहे सार्वत्रिक आरोग्य सेवेची सुविधा, प्रत्येकासाठी , प्रत्येक ठिकाणी. आल्माआटा येथील जागतीक शिखर परिषदेमध्ये Health for All By  2000 AD  हा निर्णय 1986 साली झाला.  हे उदिदष्ट साध्य करण्यासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या. 32 वर्षानंतर पुन्हा Universal Health Coverage  हे घोषवाक्य जागतीक आरोग्य संधटनेला घ्याव  लागल. कारण आरोग्यांच्य सुविधा प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी आजही उपलब्ध नाहीत. आजही दुर्गम भागात आदिवासी भागत शहरानजीकच्या आणि शहरातील अमर्याद वाढलेल्या झोपडपट्टी भागात सार्वत्रिक आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. प्राथमिक लसीकरणापासून  वंचीत असणारी अर्भके, प्रसुती सेवेसाठी तज्ञांची अनउपलब्धता, कुपोषणामुळे होणारे अर्भक मृत्यू हे चिंतेचे विषय आहेतच. त्या शिवाय लवकर निदान योग्य व पूर्ण उपचार न मिळालेने होणारे क्षयरोग मृत्यू, मधूमेह कर्करोग, हदयविकार, या सारख्‌े असांसर्गिक रोगांचे वाढते प्रमाण, किटकजन्य आजार अशी किती तरी आव्हाने आरोग्य सेवा वितरण व्यवस्थेसमोर आहेत. चला सज्ज होवूया आणि एकजुटीने या अव्हानाचा मुकाबला करुया.  जनसेवाच्या या मंगलमय, पुण्यमय कार्यासाठी सर्व आरोग्य सेवा वितरकांना शुभेच्छा. आभार श्री  जोशी  यानी मानले

नेर्लीत युवा संस्थेच्या एचआयव्ही तपासणी 

गोरगरिबांच्यासाठी सार्वत्रिक आरोग्य सेवा दर्जेदार बनत आहेत. आरोग्यसेविका अनघा पाटील

उचगाव :- सार्वत्रिक आरोग्य सुरक्षा, सर्वांसाठी ,सर्व ठिकाणी आरोग्य सेवा पोहचत आहेत.शासनाच्या वतीने सर्वसामान्य रुग्णांना वेळीच उपचार मिळावेत म्हणून अनेक योजना राबविल्या जातात. अन्य आरोग्य विषयक योजनाचा लाभ रुग्णांनी घ्यावा दिवसेंदिवस  आरोग्य सेवा ही दर्जेदार रुग्णसेवा बनत चालली असल्याचे प्रतिपादन नेर्ली प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या  आरोग्य सेविका अनघा पाटील यांनी केले.

जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्याने नेर्ली ता.करवीर  येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, युवा ग्रामीण विकास संस्था,स्थंलातरित कामगार लक्षगट हस्तक्षेप प्रकल्प,महालॅब यांच्या वतीने महिला युवतीसाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले.त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी युवा संस्थेच्या एचआयव्ही /एड्स जनजागृती प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी मोहन सातपुते होते.  

यावेळी  जिल्हा परिषदेच्या वतीने आरोग्य सेविका अनघा पाटील यांना  उत्कृष्ट  आरोग्य सेवेबद्दल पुरस्कार मिळाल्याबद्दल आशा स्वयं सेविकागरोदर माता स्तनदा मातांच्या वतीने  सत्कार करण्यात आला. यावेळी आरोग्य शिबिरामध्ये रक्त तपासणी करण्यात आली. यासाठी विकासवाडी नेर्ली,तामगाव येथील महिला ,युवती, सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.                       

 या शिबिरास सामाजिक कार्यकर्ती दिपाली सातपुते ,मंगल चव्हाण,शीला पाटील, विद्या मंदिर तामगावच्या नुरजहाँ मुलाणी,आशा गटप्रवर्तक  स्वाती कांबळे, आशा स्वयंसेविका जानकी गवळी, सरिता पाटील, संगीता कांबळे ,अर्चना मोरे,आक्काताई कांबळे, महालॅबच्या टेक्निशियन सीमा जाधव,ऋतुजा मांडरेकर, शुभम पाटील ,गणेश बारटक्के, प्रल्हाद कांबळेप्रदीप आवळे ,सचिन आवळे, हालसिद्धनाथ कांबळे, समुपदेशक जीवन मोहिते, डॉ.योगिता सातपुते, डॉ.सुहास राजमाने, डॉ.शीतल शेवाळे ,प्रकल्प संचालक नंदकुमार निर्मळे याचे सहकार्य लाभले.

स्वागत  आभार अनघा पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन विद्या मंदिर नेर्लीचे समीर मुलाणी यांनी केले.

फोटो ओळ:-. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्याने नेर्ली ता.करवीर  येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, युवा ग्रामीण विकास संस्था,स्थंलातरित कामगार लक्षगट हस्तक्षेप प्रकल्प,महालॅब यांच्या वतीने महिला युवतीसाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले .यावेळी आरोग्य सेविका अनघा पाटील यांचा सत्कार करताना आशा स्वयंसेविका,नूरजहाँ मुल्लानी,शीला पाटील,आदी

किशोरवयीन मुली आणि पॅडमॅन – ज़िल्हा परिषदेचा उपक्रम

जिल्हा परिषदेमार्फत किशोरवयीन मुलींना पॅडमॅन चित्रपट शेा चे आयोजन

 (जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 535 मुलींनी  पाहीला चित्रपट)

 

मासिक पाळी व्यवस्थापन हा महिलांच्या,किशोरवयीन मुलींच्या आरोग्याशी निगडीत अत्यंत महत्वाचा विषय आहे. मात्र अद्याप ही या विषयाबाबत आपल्या समाजात खुलेपणाने बोलले जात नाही .या विषयाची जाणीव जागृती व्हावी  तसेच वैयक्तिक स्वच्छता व सॅनिटरी नॅपकीन वापराबाबत जागृती व्हावी या उदद्ेशाने शासनाकडून सर्व जिल्हयामध्ये पॅडमॅन हा चित्रपट दाखविला जात आहे.त्यानूसार कोल्हापूर जिल्हा परिषदेअंतर्गत मा.सौ.शौमिका महाडीक,अध्यक्षा,जि.प.कोल्हापूर आणि मा.डॉ.कुणाल खेमनार,मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा चित्रपट आज  जि.प. शाळांमधील किशोरवयीन मुलींना दाखविण्यात आला.

महिलांचे आरोग्य चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे.यासाठी विशेषत: किशोरवयीन मुलींनी आपल्या वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.तसेच या विषयाबाबत मुलींनी आपली आई,बहिण किंवा आपल्या शिक्षिका यांच्याशी खुलेपणाने संवाद साधला पाहिजे.असे मत मुलींना मार्गदर्शन करताना मा.अध्यक्षा यांनी मांडले.

या फिल्म शो दाखविण्याचा उदद्ेश स्पष्ट करताना मा.श्रीम.सुषमा देसाई,उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पा.व स्व.),जि.प.कोल्हापूर म्हणाल्या की,मुली वयात येताना त्यांच्यात शारिरीक,मानसिक बदल होत असतात तसेच या काळात वैयक्तिक स्वच्छता महत्वाची असते आणि यासाठी शासनाने अस्मिता योजनेअंतर्गत या मुलींना माफक दरात सॅनिटरी पॅडची उपलब्ध केली आहे.या तीन बाबी मुलींपर्यंत पोहचणेस ही फिल्म मार्गदर्शक ठरेल.

यावेळी उपस्थित  शिक्षण व अर्थ समिती चे सभापती मा.श्री.अंबरिश घाटगे,महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती मा.सौ.शुभांगी शिंदे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.इंद्रजित देशमुख यांचे आभार मा.श्री.सुभाष चौगले,शिक्षणाधिकारी(प्राथ.) यांनी मानले.

या फिल्म शो साठी उपस्थित जिल्हयातील 535 मुलींनी हा चित्रपट पाहिला.जिल्हा शिक्षण बँकेमार्फत श्री.रेपे सर यांनी सर्व मुलींना अल्पोपहार उपलब्ध करून दिला .तसेच आयनॉक्स थिएटरचे व्यवस्थापक श्री.भिसे यांनी या शो चे व्यवस्थापन केले.या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्ष तसेच शिक्षण विभाग (प्रा.)यांनी केले .

———————————————————————————-

 

 

उपमुख्य कार्यकारी अधिकारी,(पा.व स्व.)

जिल्हा परिषद,कोल्हापूर

RTE २५ % विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया 2018-19 अंतर्गत प्रवेश फेरीस मुदतवाढ

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांना सन 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 % पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. त्यानुसार सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामधील 25% आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या लिंकवरील RTE Portal वर ऑनलाईन चालू झालेली आहे.

सदर प्रक्रियेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 2880 ऑनलाईन अर्ज प्राप्तझाले आहेत. ऑनलाईन प्रणालीद्वारे पहिल्या फेरीतील RTE 25 % विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र 599 विद्यार्थ्यांची यादी निश्चित होऊन RTE च्या लिंकवर अपलोड करणेत आली आहे. तसेच सर्व पात्र 599 विद्यार्थ्यांना प्रवेश घेणेसाठी शाळेच्या नावासह SMS ऑनलाईन प्रणालीद्वारे परस्पर पाठविणेत आले आहेत. SMS प्राप्त झालेल्या पालकांनी संबंधित शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करावयाचा आहे. त्यानुसार आज दिनांक 28/03/2018 पर्यंत एकूण 300 विद्यार्थ्यांनी RTE च्या 25 % आरक्षितकोट्यामध्ये प्रवेश घेतलेला आहे. 3 विद्यार्थ्याचे अर्ज कागदपत्रांच्या त्रुटींमुळे अपात्र ठरविणेत आलेले असून अद्याप 296 अर्ज प्रलंबित आहेत. पहिल्या फेरीतील शाळा प्रवेशाची अंतिम तारीख पूर्वीच्या वेळापत्रकानुसार 31/03/2018 होती. मात्र शासनाच्या निर्देशांनुसार व पालकांच्या आग्रहास्तव प्रलंबित अर्जांचे प्रवेश निश्चित करणेसाठी दि. 04/04/2018 इ. रोजीपर्यंत शाळा प्रवेशाची मुदत वाढविणेत येत आहे. तरी दिलेल्या मुदतीत पालकांनी संबंधित शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.

 

 

 

 

 

(श्री.सुभाष रा.चौगुले)

                                                        शिक्षणाधिकारी(प्राथमिक)

                                                                        जिल्हापरिषदकोल्हापूर

जिल्हा वार्षिक योजनेतील विविध पशुवैद्यकिय दवाखान्यांना औषध पुरवठा या योजनेअंतर्गत   Inj Calcium Boro Gluconate 450 ml खरेदीस दरपत्रके मिळणेबाबत.  

जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात  जिल्हा वार्षिक योजनेतील विविध पशुवैद्यकिय दवाखान्यांना औषध पुरवठा या योजनेअंतर्गत  Inj Calcium Boro Gluconate 450 ml   खरेदी करण्यात येणार आहे.

आपले कमीत कमी दराचे Inj Calcium Boro Gluconate 450 ml (Contains – Calcium Gluconate & Boric Acid)  दरपत्रक प्रति नग  सर्व करांसहित  पोहोच दराने  दि.   /3/2018 रोजी सायं. 5.00 वाजेपर्यंत पोहोचेल अशा बेताने लिफाफा सिलबंद करुन या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा. तसेच पुरवठा केलेल्या औषधाच्या बॅचचा गुणवत्ता तपासणी अहवाल पुरवठादाराने देणेचा आहे.

कोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणेचा अधिकार राखुन ठेवणेत आलेला आहे.

 

 

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,

जिल्हा परिषद, कोल्हापूर.

RTE २५ % विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया 2018-19 अंतर्गत प्रवेश फेरीस मुदतवाढ

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांना सन 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 % पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. त्यानुसार सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामधील 25% आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या लिंकवरील RTE Portal वर ऑनलाईन चालू झालेली आहे.

सदर प्रक्रियेअंतर्गत दि. 07/03/2018 अखेर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 2880 ऑनलाईन अर्ज प्राप्त      झाले आहेत. ऑनलाईन प्रणालीद्वारे पहिल्या फेरीतील RTE 25 % विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र 599 विद्यार्थ्यांची यादी निश्चित होऊन RTE च्या लिंकवर अपलोड करणेत आली आहे. तसेच सर्व पात्र 599 विद्यार्थ्यांना प्रवेश घेणेसाठी शाळेच्या नावासह SMS ऑनलाईन प्रणालीद्वारे परस्पर पाठविणेत आले आहेत. SMS प्राप्त झालेल्या पालकांनी संबंधित शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करावयाचा आहे. त्यानुसार आज दिनांक 23/03/2018 पर्यंत एकूण 229 विद्यार्थ्यांनी RTE च्या 25 % आरक्षितकोट्यामध्ये प्रवेश घेतलेला आहे. एकाविद्यार्थ्याचा अर्ज कागदपत्रांच्या त्रुटींमुळे अपात्र ठरविणेत आलेला असून अद्याप 369 अर्ज प्रलंबित आहेत. पहिल्या फेरीतील शाळा प्रवेशाची अंतिम तारीख पूर्वीच्या वेळापत्रकानुसार 24/03/2018 होती. मात्र पालकांच्या आग्रहास्तव प्रलंबित अर्जांचे प्रवेश निश्चित करणेसाठी दि. 31/03/2018 इ. रोजीपर्यंत शाळा प्रवेशाची मुदत वाढविणेत येत आहे. तरी दिलेल्या मुदतीत पालकांनी संबंधित शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.

 

 

                                                        शिक्षणाधिकारी(प्राथमिक)

                                                          जिल्हापरिषद,कोल्हापूर

 

  मुडशिंगी येथे कॅन्सर निदान शिबीर संपन्न   !

महाराष्ट्र राज्याचे महसुलमंत्री तथा कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री नाम.चंद्रकांत दादा पाटील आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सोै.शौमिका महाडिक यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत असलेल्या आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमणार व जिल्हा आरोग्य अधिकारी सौ.उषादेवी कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत करवीर तालुक्यामध्ये कॅन्सर कॅन्सर पूर्व लक्षणे व कॅन्सर रुग्ण शोध मोहिम योजने अंतर्गत  जिल्हा परिषद कोल्हापूर व ॲपल सरस्वती हॉस्पीटल यांच्या विद्यमाने मुडशिंगी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कॅन्सर शिबीर नुकतेच संपन्न झाले.

या शिबीराचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्षा मा. सौ. शौमिका अमल महाडिक,  यांच्या शुभहस्ते व  मा. श्री. महेश चौगुले, जि. प. सदस्य, मा. सौ. वंदना पाटील, जि.प. सदस्या  यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.  या प्रसंगी बोलताना मा. सौ. शौमिका महाडिक म्हणाल्या की, ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नये, आपल्या मानसिक व शाररिक आरोग्य कडे लक्ष दयावे. शरीर , मन,  समाज सुस्थित असले तर सर्वांचे आरोग्य चांगले राहते.  प्रत्येकांनी खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी, स्वच्छता, चांगला सुसंवाद ठेवावा असे नमुद केले.

प्रास्ताविकात तालुकाआरोग्य अधिकारी डॉ.डॉ.जी.डी.नलवडे यांनी करवीर तालुक्यातील 425 आशा स्वयंसेविकांच्या मार्फत फेब्रुवारी मध्ये घरोघरी भेटी देवून कॅन्सर विषयक सर्व्हेक्षणात 2710 संशयित रुग्ण आढळले असून यासर्वच रुग्णांची वैद्यकीय अधिका-यामार्फत प्राथमिक तपासणीनंतर तालुक्यात आयोजित करण्यात येत असलेल्या कॅन्सर निदान चिकित्सासाठी आयोजित 6 शिबीरातून तपासणी करणेत आली असून. एकुण  621 रुग्णांची तपासणी  करण्यात आली असून त्यांपैकी  संशयीत कॅन्सर रुग्णांमध्ये तोडांचा -19 , गर्भाशय – 24 , स्तनांचा – 32 , इतर – 88 एकुण 160 रुग्ण संशयीत कॅन्सरचे आहेत. एकुण 73 संशयीत रुग्णांच्या पुढील तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले आहे.  रुग्णांची तपासणी व चाचणी ॲपल सरस्वती हॉस्पीटल आणि कोल्हापूर कॅन्सर सेंटर यांच्याकडे करणेत येऊन कॅन्सर उपचार कराव्या लागणा-या रुग्णांना 15000 पर्यत अनुदान देण्यात येणार असलेचे विषद केले.

ॲपल सरस्वती हॉस्पीटलचे कॅन्सर तज्ञ डॉ.निखील गुळवणी यांनी सद्याच्या युगात खाण्या-पिण्याच्या बदल्या सवयी,युवक आणि तरुणांमधील तंबाखु,मावा,गुटखा यांसारख्या व्यसनांचे वाढते प्रमाण,महिलांमधील आरोग्याच्या समस्यांमधील संकोचितपणा व होणारे दुर्लक्ष,सोशिकता तसेच त्यांच्यामधील वाढते मिसरीचे व्यसन प्रमाण तसेच रासायनिक खते आणि किटक नाशकांचा अतिरिक्त वापर यामुळे 1995 सालाच्या प्रमाणात कॅन्सरचे प्रमाण 200 पटीने वाढले असून यासाठी सर्वानींच एकत्र लढा देणे गरजेचे असून यासाठी जिल्हा नियोजन मंडळ आणि कोल्हापूर जिल्हा परिषद यांनी उचललेले पाऊल निश्चितच उपक्रमशिल आणि नाविन्यपूर्ण असून कॅन्सर रुग्णांना दिलासादायक असल्याचे नमूद केले.

सदर शिबीरासाठी पं.स. सौ शौभा राजमाने, सौ. सरीता कटेजा,  ग्रा.प. मुडशिंगीचे सरपंच सौ. सुरेखा गवळी, उपसरपंच मा. तानाजी पाटील, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुभाष इंदूलकर यांनी केले व आभार डॉ एफ ए देसाई यांनी मानले. या शिबीर आयोजनसाठी  वै.अ. डॉ. मुल्ला मॅडम व सर्व कर्मचारी ,  आशा स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.

——————————————————————————————