*श्रमदानाने साकारली कचऱ्याच्या ठिकाणी फुलबाग*

*श्रमदानाने साकारली कचऱ्याच्या ठिकाणी फुलबाग*

*स्वच्छता ही सेवा* आणि *नमामी पंचगंगे उपक्रमा अंतर्गत पंचगंगा प्रदूषण मुक्ती* या कार्यक्रमा अंतर्गत मौजे शिरढोण ता.शिरोळ, जि. कोल्हापूर येथे दि 22/9/2018 रोजी श्रमदानाच्या माध्यमातून
गावातील सार्वजनिक शौचालय जवळील जागा स्वच्छता करून तेथे फुलाच्या रोपांची लागवड करण्यात आली व त्यामाध्यमातून अस्वच्छ जागांचे उच्चाटन करण्यात आले तसेच या रोपांना तात्काळ कुंपण करून घेण्यात आले व सांगोपनाची जबाबदारी स्थानिक तरुण मंडळांनी स्वीकारली.

सांडपाणी व्यवस्थापनासाठी गटारीच्या पाण्यावर कर्दळी लागवड करण्यात आली.

याचवेळी एस टी स्टँड परिसराची स्वछताही करण्यात आली.

सदर श्रमदानामध्ये *मा श्री अमन मित्तल मुख्य कार्यकारी अधिकारी, जि प कोल्हापूर प्रियदर्शिनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी स्वच्छता, सौ.अर्चना चौगुले, सभापती , प स शिरोळ, सौ.बिलकश मुजावर सरपंच शिरढोण ,श्री विजय जाधव, गट विकास अधिकारी, प स शिरोळ, श्री. विजय परीट, सहा. गविअ प स शिरोळ, गुंडाप्पा खोत उपसरपंच,श्री विकास कांबळे (माजी जि.प.सदस्य ) श्री चद्रकांत मोरे (सर), सर्व ग्राप सदस्य, श्री रेळेकर, ग्रामसेवक शिरढोण , तरुण मंडळ पदाधिकारी, व ग्रामस्थ तसेच पस शिरोळ कडील sbm कक्षाकडील सर्व कर्मचारी* यांनी आपले बहुमूल्य योगदान दिले .
🙏🙏🙏🙏🙏🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

 

 

 

माझी शाळा समृद्ध शाळा आभियान

जिल्हा परिषद कोल्हापूर,शिक्षण विभाग अंतर्गत
डॉ जे पी नाईक “माझी शाळा समृद्ध शाळा आभियान” अंतर्गत

दिनांक 21 सप्टेंबर रोजी गगनबावडा तालूक्यामध्ये राजर्षि शाहू जन्मस्थळापासून ज्ञानज्योत घेऊन व शाहूना अभिवादन करून शाळा शाळात अभियान सूरू केले.
त्या प्रसंगी मा आमदार सतेज पाटील साहेब , मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल सो , उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा शिक्षणाधिकारी रविकांत आडसूळ सो
श्री भगवान पाटील जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते…

 

 

क्षयरोग मुक्त तालुका मोहिम ही  क्षयरोग मुक्त भारत च्या दिशेने आश्वसक पाऊल आहे – सौ. शौमिका महाडिक

क्षयरोग मुक्त तालुका मोहिमे चा पन्हाळा येथे शुभारंभ

नॅशनल स्ट्रॅटेजिक प्लॅन २०१७-२०२५ नुसार आपण क्षयरोग मुक्त भारत च्या दिशेने वाटचाल करत आहोत. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने  २०३५ पर्यंत भारत क्षयमुक्त करण्याचे धोरण आखले आहे. परंतुमा.पंतप्रधानसाहेबानी सन २०२५  मध्ये भारत सरकारने भारत क्षयमुक्त (TB FREE INDIA ) करण्याचा नारा दिला आहे. या धोरणाचा एक भाग म्हणून क्षयरोग मुक्त तालुका ही  मोहीम  राबविली जात आहे . या मोहीमे अंतर्गत पहिल्या टप्यामध्ये कोल्हापूर जिल्हयातील पन्हाळा व गगनबावडा हे दोन तालुके निवडले आहेत.राज्यक्षयरोग विभागाच्या मोहिमेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे दोन तालुके क्षयरोग मुक्त तालुका मोहिमे साठी निवडले  गेले आहेत .त्यानुसार एकूण टी.बी. केस शोधण्याचा दर स्थिर,.थुंकी दूषित पेशंट शोधण्याचे  गुणोत्तर कमी ,टीबी एचआयव्ही सह-संक्रमण दर कमी,बाल रोग टीबी केस शोधण्याचे प्रमाण कमी,भौगोलिक  वातावरण  निरोगी व चांगले , पुरेसे मनुष्यबळ, चांगल्या निदानाची सुविधा हे निकषहे तालुके पूर्ण करतात.पोलीओरोगजसाहद्दपारकेलात्यापद्धतीनेक्षयरोगालाहद्दपारकरूया. पूर्णसमर्पितवृत्तीनेआपल्या कामाच्यामाध्यमातूनदुसर्यालाप्रेरीतकरणेव आदर्श व्यक्ती बनून कामाबद्दल दुसर्यांना आदर्श घालून देणे हि काळाची गरज आहे. क्षयरोग विषयी  संपूर्ण शास्त्रीय माहिती आत्मसात करणे हे आपले आद्य कर्तव्य राहिल असे प्रतिपादन मा. सौ. शौमिका महाडिक  अध्यक्ष्य,  जि. प. कोल्हापूर यांनी यांनी मत मांडले . त्या पन्हाळा येथे पंचायत समिती सभागृहामध्ये क्षयरोग मुक्त तालुका मोहिमेच्या अध्यक्षीय भाषणात  बोलत होत्यात्यांच्या हस्ते  क्षयमुक्त तालुका  मोहिमेचे उदघाटन करण्यातआले. या मोहिमेस जिल्हापरिषद पूर्ण सहकार्य करील अशी ग्वाही त्यांनी दिली.

                          या मोहिमेमध्ये सर्व सामाजिक संस्था ,महिला मंडळेस्थानिक तरुण मंडळेबचत गट यांचा सहभाग आवश्यक आहेत सेच मोहीमे अंतर्गत  सर्व लोकांना प्रतिबंधक उपायांची माहिती द्यावी व व्यापक जनजाग्रुती करावी,असे मत  मा. सर्जेराव पाटील (पेरीडकर) सभापतीआरोग्य व बांधकाम समिती.,  जि. प. कोल्हापूर यांनी मांडलेया धोरणाचा एक भाग म्हणून क्षयरोग मुक्त तालुका (TB FREE BLOCK CAMPAIGN) ही  मोहीम  राबविली जात आहे . या मोहीमे अंतर्गत पहिल्या टप्यामध्ये कोल्हापूर जिल्हयातील पन्हाळा व गगनबावडा हे दोन तालुके निवडले आहेत.यामोहिमेमध्ये  नवीन क्षय रुग्णांची संख्या कमी करणे, लागण झालेल्या जुने  नवीन क्षयरुग्न औषधउपचार देऊन बरेकरणे,क्षयरुगणांचा मृत्यदर कमी करणे  क्षयरोगामुळे  होणारी विकृती कमी करणे, थुंकी दूषित रुगांकडून इतर लोकांना होणारा संसर्गजनजगृती द्वारे कमी करणेखाजगी डॉक्टरकेमिस्टांचा सहभाग वाढिवणे,  हा मुख्य उद्देश आहे या मोहिमेचा मुख्य उद्देश हा  सर्व क्षयरुग्ण शोधणे, त्यांच्यावर त्वरित उपचार करणे व नवीन केसेस तयार होऊ नये याची पुरेपुर काळजी.घेणे  हा राहील असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा जी. कुंभार  यांनी प्रास्तविक भाषणात सांगितले. नवीन शासन धोरणानुसार क्षयरुग्णांसाठी पोषण आहारासाठी दरमहा ५००/- रुपये तर खाजगी वैद्यकीय व्यवसायकांसाठी निदानासाठी ५००/- रुपये व औषधपचार पूर्ण केल्यावर ५००/- रुपये अनुदान थेट लाभार्थी हस्तांतरण (डी.बी.टी.) च्या माध्यमातून एप्रिल २०१८ पासून देण्यात येत आहेत आशी माहिती त्यांनी दिली.

                       नियमितचाकोरीतुननजाताप्रत्येकखोकल्याचारूगणया हासंशयित क्षयरुग्ण समजूनत्वरितयोग्यउपाययोजनाकरावीतसेचकोल्हापूरजिल्हा हा नेहमीच नावीन्यपूर्ण यॊजना राबवण्यात अग्रेसर जिल्हा आहेहि मोहीम निशिचीतपणे यशस्वी करू अशी ग्वाही मा. डॉ. योगेश साळे जिल्हा आरोग्य अधिकारीजिल्हा परिषदयांनी दिली .हि मोहीम दोन टप्प्यामध्ये वर्षभर राबवण्यात येणार आहे, तालुक्यातील सर्व गावातील प्रत्येक घरामध्ये  जाऊन  सर्वेक्षणकरण्यात येणारआहेयासाठी ए.ए.एम. एम.पी.डब्ल्यूआशा कार्यकर्ती व  सर्व आरोग्य कर्मचारी च्या मदतीने घरातील प्रत्येक व्यक्तींना  क्षयरोग विषयी शास्त्रीय माहिती देणे व  क्षयरोग लक्षणाबाबत विचरणा  करून लक्षण आढळल्यास त्वरित पुढील तपासणीकरिता प्रा. आ. केंद्रग्रामीण रुग्णालयजिल्हा क्षयरोग केंद येथे आवश्यकतेनुसार  संदर्भित करण्यात येणारआहेतसेच क्षयमुक्त तालुका मोहिमेसाठी पन्हाळा व गगनबावडा तालुका निवडण्यामागचे निकष तसेच  तालुक्याची भोगोलिक परिस्थिती ,रुग्णस्थिती इ . माहिती  डॉ. अनिल कवठेकरतालुका आरोग्य अधिकारीपन्हाळा, यांनी विषद केली.     

                        यावेळी  डॉ. मानसी कदमवैद्यकीय अधिकारी,. जिल्हा क्षयरोग केंद्रकोल्हापूर यांनी आभार मांडले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन   श्री एम एस पाटील यांनी केले .यावेळी मा. सौ. उज्वला उत्तम पाटीलसभापती पंचायत समितीपन्हाळा मा. श्रीम. मंगल संजय कांबळे सभापतीपंचायत समिती गगनबावडामा. श्री.पांडुरंग दत्तू भोसले उपसभापतीपंचायत समिती,गगनबावडा माश्री.पृथ्वीराज भगवानराव सरनोबतमाजी सभापती सभापती पंचायत समिती पन्हाळा मा.श्री.अनिल नामदेव कंदुरकसदस्य पंचायत समिती पन्हाळा, मा.श्री.रणजितशिंदेसरकार – जाखले मा. श्री तुलसीदास  शिंदे गटविकास अधिकारी वर्ग -१ पंचायत समिती पन्हाळाडॉ. विशाल चोकाककर,तालुका आरोग्य अधिकारी,गगनबावडा,  डॉएस.सी.अभिवंत वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालयकोडोलीडॉ.एस.बी.गायकवाडवैद्यकीय अधीक्षकग्रा.रु.पन्हाळा, डॉ. विनायक भोई  वैद्यकीय अधिकारीजिल्हा क्षयरोग केंद्रकोल्हापूर जिल्हा प्रसिद्धीअधिकारी.मा. एकनाथजोशी उपस्थित होते.

या प्रसंगी पन्हाळा व गगनबावडा तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी,  सर्व आरोग्य कर्मचारी, अशा गटप्रवतक एसटी .एस /एसटीएलएस तसेच जिल्हा क्षयरोग केंद्राचे अधिकारी व कर्मचारी,   छायचित्रकार , पत्रकार  नागरिक मोठ्या  संख्येने उपस्थित होते.

तंबाखू मुक्ती साठी मा मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचे समोर भाषण करताना जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी

तंबाखू मुक्ती साठी मा मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचे समोर भाषण करताना जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी

विद्यामंदीर बालिंगे येथे शाळा भेटी दरम्यान शालेय पोषण आहाराचा आस्वाद घेताना मा.मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल साहेब सोबत मा.राजू सुर्यवंशी साहेब सभापती पं.स.करवीर

आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी विद्यामंदीर बालिंगे येथे शाळा भेटी दरम्यान शालेय पोषण आहाराचा आस्वाद घेताना मा.मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल साहेब सोबत मा.राजू सुर्यवंशी साहेब सभापती पं.स.करवीर यावेळी मा मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी शाळा डिजिटल केलेबद्दल व सॉफ्टवेअर चा वापर सुरू असलेबाबत समाधान व्यक्त केले.

 

 

 

स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण)-2018 अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे सर्वेक्षण सुरू

केंद्र शासनाच्या वतीने दिनांक  13 जुलै, 2018 रोजी “स्वच्छता सर्व्हेक्षण ग्रामीण 2018” ची घोषणा करण्यात आली. हे सर्व्हेक्षण दिनांक 1 ते 31 ऑगस्ट 2018 पर्यंत होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये उत्कृष्ठ ठरणा-या राज्यांना तसेच जिल्हयांना राष्ट्रीय स्तरावरुन दि. 2 ऑक्टोंबर 2018 रोजी ,महात्मा गांधी जयंतीच्या दिनी सन्मानित करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत कोल्हापूर जिल्हयाच्या सर्वेक्षणास सुरूवात झाली आहे.

सर्वेक्षणासाठी केंद्र शासनामार्फत निवडण्यात आलेल्या के. आर. सी मार्फत गावांची तपासणी सुरू आहे. या सर्वेक्षणांतर्गत कोल्हापूर जिल्हयातील पन्हाळा तालुक्यातील ग्राम पंचायत बाजारभोगावं व इंजोळे या गावांची व राधानगरी तालुक्यातील ग्रा. पं. कोते या गावाची के. आर.सी मार्फत  तपासणी पूर्ण झाली आहे. तर उर्वरित गावांची देखील क्रमाने तपासणी होणार आहे.

            केंद्र शासनाने निवडलेल्या या संस्थेकडुन सार्वजनिक ठिकाणांचे थेट निरीक्षण  होणार आहे. यामध्ये शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक ठिकाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रें, सर्व प्रार्थना स्थळे / मंदिर ठिकाण, यात्रास्थळे, बाजाराची ठिकाणे, तसेच ग्रामपंचायत अंतर्गत येणारी विविध सार्वजनिक ठिकाणे इत्यादि स्थळांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

“स्वच्छ सर्वेक्षण- ग्रामीण 2018” अंतर्गत गावस्तरावर गावचे लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक, निगराणी समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, स्वच्छागृही, आशा आणि शिक्षकांच्या माध्यमातुन पाहणी केली जाणार आहे. यासोबतच प्रत्येकी 10 सामान्य नागरीक तसेच सामुहिक बैठकांच्या माध्यमातुन सर्वेक्षण केले जाणार आहे. उत्तम गुणवत्तापूर्ण कामगिरी केलेल्या जिल्हयांची क्रमवारी ठरविण्यासाठी मंत्रालयाने एकात्मक व्यवस्थापन माहिती प्रणाली (IMIS) विकसित केली आहे.

या सर्वेक्षणांतर्गत लोकांना प्रत्यक्ष भेटून त्या आधारे माहिती गोळा केली जाणार आहे. यातंर्गत स्वच्छतागृहींची खुली बैठक ,व्यक्तीगत मुलाखती, सामुहिक चर्चा करुन प्रतिक्रिया घेण्यात येईल. गावाची पाहणी केली जाईल यामध्ये गावाची स्वच्छता, घन तसेच द्रव्य कचरा व्यवस्थापन , कचरा व्यवस्थापनासाठी गावपातळीवर राबविण्यात आलेले उपक्रम याची पाहणी केली जाणार आहे. स्थानिक नागरीकांकडुन प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन प्रतिक्रीया नोंदविली जाईल, अभियानाबाबत लोकांमध्ये असणारी जागृती, स्वच्छ भारत मिशन बद्दलची प्रतिक्रिया, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे गाव पातळीवर स्थानिक पुढाकाराने उभारण्यात आलेले सुरक्षित उपाययोजनेची नोंद घेतली जाईल. तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाबाबतची काही नवीन माहिती असल्यास गोळा केली जाणार आहे.

या सर्वेक्षणाचा महत्वाचा भाग म्हणजे या सर्वेक्षणासाठी ऑनलाईन प्रतिक्रिया नोंदविल्या जाणार आहेत. यासाठी प्ले स्टोअरवरून ssg 18 हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यामध्ये महाराष्ट्र राज्य निवडून व कोल्हापर जिल्हयासाठी स्वच्छतेबाबत विचारलेल्या 4 प्रश्नांना सकारात्मक  उत्तरे द्यावयाची आहेत. कोल्हापूर  जिल्हयाला जास्तीत जास्त मते मिळतील व कोल्हापूर जिल्हा या सर्वेक्षणामध्ये अव्वल येईल. यासाठी जिल्हयातील सर्व नागरिकांनी या ॲपव्दारे स्वच्छता मतदान करावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मा. सौ. शौमिका महाडीक व  प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. डॉ. आर.पी. शिवदास यांनी केले आहे.

 

(प्रियदर्शिनी चं.मोरे)

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पा. व स्व.)

जिल्हा परिषद, कोल्हापूर

14 नोव्हेंबर 18 पासून जिल्हयात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ

14 नोव्हेंबर 18 पासून जिल्हयात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ

 

जगभर धोका निर्माण केलेल्या गोवर रुबेला या प्राणघातक  रोगावर नियंत्रणासाठी  जिल्हयातील 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे.  या महत्वाकांक्षी मोहिमेचे नियोजनासाठी  दिनांक 3 4 ऑगस्ट 18 रोजी कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना  श्री. अविनाश सुभेदार , जिल्हाधिकारी, कोल्हापूर म्हणाले की, या मोहिमेसाठी आारोग्य विभाग, महिला बाल कल्याण विभाग, शिक्षण विभाग, खाजगी वैदयकीय व्यवसायीक, लोकप्रतिनिधी , माध्यमे यांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्वाचा आहे  असे  कार्यशाळेच्या मार्गदर्शन प्रसंगी बोलतांना नमुद केले.  जागतिक आरोग्य संघटनेचे, सर्व्हिलन्स वैद्यकीय अधिकारी डॉ हेमंत खैरनारे कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक होते.

प्रस्ताविकात बोलतांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ योगेश साळे म्हणाले की,  गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचे सुक्ष्म नियोजन मा. शौमिका महाडिक, अध्यक्षा जि.प. कोल्हापूर, मा. सर्जेराव पाटील, सभापती आरोग्य समिती,  डॉ. रवि शिवदास, मु.का.अ यांच्या मार्गदर्शना खालील करण्यात आले आहे. मोहिम यशस्वी होणेसाठी बिनचुक मायक्रोप्लॅन, प्रसार, प्रचार, वातावरण निर्मिती आवश्यक आहे असे नमुद केले. जिल्हयातील अंदाजे 10 लाख 50 हजार बालकांना या मोहिमेत गोवर रुबेला लसीकरण करण्यात येणार आहे.

कार्यशाळेस डॉ सी जि शिंदे प्रायार्य कुटूबं कल्यान प्रशिक्षण केंद, डॉ डि. सी. केंम्पीपाटील, जिल्हा शल्यचिकीत्सक, कांेल्हापूर, डॉ विलास देशमूख निवासी वैद्वकिय अधिकारी सि पी आर हास्पीटल, डॉ एफ.ए. देसाई, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, डॉ डि.एस. थोरात, वैद्वकिय अधिकारी रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, शासकिय वैदयकिय महाविदयालय कोल्हापूर व पी एस एम विभागाचे डॉ हेमंत खैरनारे सर्वेलन्स मेडिकल ऑफीसर, जागतिक आरोग्य संघटना, लायन्स क्ल्ब रोटरी क्लब व आयूर्वेदिक संघटना प्रतिनिधी,  डॉ हेंमत भारती अध्यक्ष इंडियन असोशिशन ऑफ पेडीयाट्क्सि, सर्व तालूका आरोग्य अधिकारी जिल्हयातील सर्व वैदयकिायअधिक्षक  व सर्व  वैछयकिय अधिकारी उपस्थित होते

गोवर हा अत्यंत संक्रामक आणि घातक आजार आहे.  जो मुख्य: बालकांमध्ये  होतो सन 2016 च्या आकडेवारीनूसार गोवर आजारामुळे जवळपास 49200 मुले सपूंर्ण भारतामध्ये दरवर्षी मृत्यमुखी पडतात. रुबेला हा त्यामानाने सौम्य संक्रामक  आजार आहे. जो मुलांना तसेच प्रौढ व्यक्तीनां देखाील होतो. परंतू जर गर्भवती  स्त्रीयांना रुबेला या आजारांचा संसर्ग झाला तर या मूळे अचानक गर्भपात किंवा जन्मजात दोष  जसे अंधत्व बहिरेपणा आणि ़हदयविकृती होवू शकते. हे बालक जन्मजात रुबेला सिंडोम  (सीआरएस) म्हणून ओळखले जाते असे बालक त्या कुटूंबासाठी, समाजासाठी सुध्दा ओझे लादल्यासारखे आहे

भारत सरकारणे सन 2020 सालापर्यंत गोवर या आजाराचे निर्मलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे उदिदष्ट ठेवले आहे. या साठी भारत सरकार टप्याटप्याने गोवर रुबेला ही लस विविध राज्यामधिल नियमित लसरकरण कार्यक्रमाध्ये  समाविष्ट करीत आहे. 14 नोव्हेबंर 2018 मध्ये महाराष्ट्र राज्यात गाोवर रुबेला लसीकरण मोहिम आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. या माहिमे अतंर्गत कोल्हापूर जिल्हयातील 9 महिने ते 15वर्षा पर्यंतच्या वयोगटातील एकूण (लोकंसखेच्या 30 टक्के) लाभार्थीचे लसीकरण करण्याचे लक्ष निर्धारित केलेलंे आहे.  या पैकी काही लाभार्थ्‌ीना जरी या मोहिमेआगोदर गोवर रुबेला लस दिलली असेल तरी सुध्दा त्याना हा अतिरिक्त डोस दयायचा आहे. मोहिमेसाठी निर्धारित करणेत आलेल्या वयोगटातील 9 महिने ते 15 वर्षापर्यंत एकूण लाभार्थी पैकी 60 ते 65 टक्के लाभार्थी हे शाळेत जाना-या विद्यार्थ्यापैकी आहेत.

गोवर रुबेला लसीकरण मोहिम सर्व शासकिय व खाजगी शाळेमध्ये अगंणवाडी केंद्र आरोग्य उपकेंद्र तसेच सर्व प्रा आ केद्राध्ये व लसीकरण सेवा सत्राच्या ठिकाणी 4 ते5 आठवडयाच्या कालावध्ीामध्ये घेण्यात येणार आहे. या माहिमेमध्ये शिक्षण विभाग महिला व बालकल्याण विभाग गृह विभाग माहीती व प्रसारण विभाग रेल्वे विभाग पंचायत राज विभाग ई विभागांचा सहभाग महत्वाचा आहे. मोहिम यशस्वी करणेसाठी ग्रामीण व नागरी विभागामध्ये 100 टक्के लाभार्थीनां लसीकरण  करणे आश्यक आहे

गोवर रुबेला लसीकरण ज्ल्हिास्तरीय कार्यशाळा दि. 03 व 04 ऑगष्ट 2018 रोजी आयोजित करणेत आली होती. या वेळी त्यानी 9 महिने ते 15 वर्षापर्यंतच्या आपल्या बालकाना मिझल रुबेला जंग पुकारणर योध्ये (MR Warriers)  घोषित करुन सर्व विभागांनी सहभाग घेवून मोहिम यशस्वी करावी जिल्हयातील सर्व शासकिय व सर्व खाजगी शाळानी तसेच शाळाभाळय मोहिमेत सहभागी होवून सहकार्य करावे 9 महिने ते 15 वर्षापर्यंतच्या आपल्या बालकांना मिझल रुबेला डोस घेणसाठी पालकानी प्रोत्सहित करावे व गोवर रुबेला विरुध्द लढा जिंकण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले

 

जिल्हा आरोग्य अधिकारी

जिल्हा परीषद कोल्हापूर

किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम

 

 

जिल्हा परिषद कोल्हापूर येथे आज किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जिल्हा स्तरीय प्रशिक्षणाचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. वैयक्तिक स्वच्छतेमधील अतिशय महत्वाचा मानला जाणार विषय हा शालेय मुलींपर्यंत पोहचविणे तसेच या विषयाबाबत शास्त्रशुध्द माहिती मुलींना मिळावी. त्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी मासिक पाळी व्यवस्थापन हा कार्यक्रम राबविला जात आहे.

या कार्यक्रमांतर्गत आज जिल्हा परिषदेमध्ये प्रविण प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, मा. सौ. शौमिका महाडीक, उपाध्यक्ष मा. श्री. सर्जेराव पाटील, जि. प. कोल्हापूर, महिला व बालकल्याण सभापती मा. सौ. वंदना मगदूम, मा. सौ. स्वरूपाराणी जाधव, मा.सौ. विजया पाटील जि. प. सदस्य  यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. या प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक म्हणून युनिसेफच्या प्रतिनिधी मा. श्रीम. अपर्णा कुलकर्णी तसेच जिल्हा परिषद सांगली येथील प्रविण प्रशिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी उपस्थिातांचे स्वागत आणि  प्रास्ताविक मा. श्रीम. प्रियदर्शिनी मोरे,उप मु का अ(पा.व स्व.) यांनी केले व प्रशिक्षणाचा उदद्ेश सांगितला. मासिक पाळी हा विषय अद्याप ही रूढी, परंपरा आणि अंधश्रध्दा यामध्ये बंद आहे.समाजाचा या विषयाबाबतचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक असल्याचे सांगून या प्रशिक्षणासाठी उपस्थित प्रशिक्षणार्थींनी चांगल्या पध्दतीचे प्रशिक्षण घेवून हा विषय मुलींपर्यंत पोहोचवावा असे मा.अध्यक्ष, जि.प. कोल्हापूर यांनी सांगितले. तर युनिसेफच्या प्रतिनिधी मा. श्रीम. अपर्णा कुलकर्णी यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. हा विषय अतिशय नाजूक असून या विषयाबाबत मुलींना प्रशिक्षण देताना त्यांना वेगवेगळया खेळांच्या आणि चर्चासत्राच्या माध्यमातून सहभागी करून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा परिषद सांगली येथील प्रविण प्रशिक्षकांनी उपस्थितांना प्रशिक्षण दिले.

सदर प्रशिक्षण हे दोन दिवसांचे असून यामध्ये तालुकास्तरावरून शिक्षिका तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण घेत आहेत. हे  प्रविण प्रशिक्षक तालुकास्तरावरील प्रशिक्षकांना प्रशिक्षण देतील आणि ते प्रशिक्षक प्रत्यक्ष शाळांमध्ये मुलींना प्रशिक्षण देतील असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. प्रशिक्षणादरम्यान मासिक पाळीबाबत माहिती पुस्तिका, हॅन्डबुक आणि लॅमिनेटेड चार्ट असे प्रशिक्षण साहित्य वाटप करण्यात आले.

 

प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आभार मा.श्री. सोमनाथ रसाळ,उप मु का.अ (म.बा.क) यांनी मानले. प्रशिक्षणाचे आयोजन पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी केले होते.

दिनांक  01/08/2018 इ.रोजी  लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती  जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे दि. 01/08/2018 रोजी सकाळी 11 वाजता साजरी करणेत आली. त्या प्रसंगी श्री.मदन  आनंदराव जाधव, अधीक्षक (माध्यमिक शिक्षण विभाग) व श्रीम. जयश्री संजय जाधव विस्तार अधिकारी (शिक्षण) (शिक्षण प्राथमिक विभाग)  यांचे हस्ते फोटो पूजन करणेत आले.

यावेळी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.सुषमा देसाई, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) श्री.रविकांत आडसुळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) श्री.राजेंद्र भालेराव,  मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. संजय राजमाने, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व) श्रीम. प्रियदर्शनी मोरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बाक) श्री. सोमनाथ रसाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे, कृषि विकास अधिकारी श्री.चंद्रकांत सूर्यवंशी, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.राहुल कदम, यांच्यासह व सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.

यावेळी श्री. संजय  लोढे, विषय तज्ञ यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची माहिती व सुत्र संचलन केले. यावेळी मोठया संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

(रविकांत आडसुळ)

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)

                                                                                           जिल्हा परिषद, कोल्हापूर