जिल्ह्यामध्ये हागणदारीमुक्तीसाठी विशेष मोहीम  (अद्याप शौचालय सुविधा नसलेल्या कुटुंबांनी  पंचायत समितीशी संपर्क साधावा.) 

कोल्हापूर : दिनांक ११.०९.२०१९

                                                केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाकडून देशाच्या ग्रामीण भागामध्ये संपूर्ण स्वच्छता व हागणदारीमुक्तीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आह यामध्ये स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत योजनेसाठी जे निकष आहेत त्याप्रमाणे पात्र परंतु, त्या कुटुंबाचे यापूर्वी करण्यात आलेल्या कोणत्याही सर्व्हे / यादीमध्ये नाव समाविष्ट नाही, तसेच सद्यस्थितीत शौचालय सुविधा उपलब्ध नसलेल्या व अद्याप कोणत्याही योजनेतून शौचालय बांधकामासाठी अनुदान घेतलेले नाही अशा पात्र कुटुंबांचा या विशेष मोहिमेमध्ये समावेश होणार आहे.

        याप्रमाणे पात्र कुटुंबांनी स्वतःहुन वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्याबाबतची मागणी आपल्या संबंधित पंचायत समितीकडे सादर करावी असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.

(प्रियदर्शिनी च. मोरे )

उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पा. व स्व.)

जिल्हा परिषद कोल्हापूर

स्वच्छता हि सेवा अभियानातून प्लास्टिक मुक्तीचा नारा  (स्वच्छता हि सेवा – जिल्हा स्तरीय कार्यशाळा संपन्न)

     दि. ११ सप्टेंबर ते २ ऑक्टोम्बर  २०१९ या कालावधीत केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयामार्फत स्वच्छता हि सेवा अभियान राबविले जाणार आहे . प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन हि या अभियानाची प्रमुख संकल्पना आहे.   कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत ग्राम पंचायत स्तरावर हे अभियान यशस्वीरीत्या राबविण्यासाठी आज जिल्हास्तरा वर जिल्हा परिषद कर्मचारी व गट विकास अधिकारी यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन हि या अभियानाची प्रमुख संकल्पना असल्याने स्वच्छता हि सेवा अभियानातून प्लास्टिक मुक्त जिल्ह्यासाठी सर्वानी योगदान द्यावे असे प्रतिपादन मा. श्री. अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी , जी. प. कोल्हापूर यांनी केले . व अभियान यशस्वी करण्यासाठी उपस्थितांना मार्गदर्शन हि केले. या कार्याशाळेसाठी मा.  आर.पी. शिवदास, अति. मु.का.अ ., जी.प.कोल्हापूर उपस्थित होते. अभियानाबाबत मा. श्रीम. प्रियदर्शिनी मोरे उप.मु.का.अ . (पा .व स्व. ) यांनी प्रास्ताविक केले.
                                                   या अभियानांतर्गत विविध उपक्रम घेतले जाणार असून त्यामध्ये तालुकास्तरावर प्रशिक्षण/ कार्यशाळा, प्रभातफेऱ्यांचे आयोजन, तरुण मंडले, सामाजिक संस्था, उद्योजक, शिक्षण संस्था, दवाखाने, शेतकरी, ग्रामस्थ यांच्या बैठक आयोजित करून त्यांना बंदी असलेले प्लास्टिक व प्लास्टिक चे दुष्परिणाम इ. बाबत मार्ग दर्शन केले जाणार आहे. शालेय स्तरावर अभियानाबाबत निबंध, चित्रकला, वक्तृत्व इ. स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. २ ऑक्टोम्बर ,२०१९ रोजी सर्व गावांमध्ये प्लास्टिक वस्तू न वापरणेबाबत शपथ घेऊन महाश्रमदान मोहिमेच्या माध्यमातून प्लास्टिक संकलन उपक्रम राबविला जाणार आहे. व दि ३ ते २७ ऑक्टोम्बर ,२०१९ या कालावधीत संकलित प्लास्टिक पुनर्चक्रणासाठी देणे असे उपक्रम राबविणेत येणार आहेत.

                                                               या अभियानांतर्गत ग्राम पंचायत स्तरावर आवश्यक ते नियोजन करून सर्व स्तरावरील लोकांचा सहभाग घेऊन अभियान यशस्वी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

(प्रियदर्शिनी मोरे )

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा .व स्व . )

जि.प . कोल्हापूर

केंद्र शासनाचा पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2019 राज्यामध्ये गुणांकनानुसार जिल्हा परिषद कोल्हापूरचा प्रथम क्रमांक

ग्रामविकास विभागाकडील जाक्रं झेडपीए 2018/प्रक्रं 145/पंरा 1दिनांक 28 जानेवारी 2019 च्या प्राप्त पत्रानुसार केंद्र शासनाच्या पंडित दिनदयाळ उपाध्याय सशक्तीकरण पुरस्कार 2019 अंतर्गत (तपासणी वर्ष 2017-18) जिल्हा परिषदेने केंद्रस्तरावर ऑनलाईन्‍ प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने  जिल्हा परिषद कोल्हापूरची मा. श्री  श्रीनिवास बावा व श्री ‍ अनिल कुमार  या दोन सदस्यीय  केंद्रीय पथकाकडुन दि. 07-02-2019 ते 09-02-2019 अखेर जिल्हा परिषदेची कागदपत्रांची व क्षेत्र स्तरावरील प्रत्यक्ष पडताळणी करणेत आलेली होती. यामध्ये जिल्हा परिषदेचे प्रशासकीय बाबी, सभा कामकाज, सभा कामाकाजाचे रेकॉर्ड, जि.प. सदस्य यांची सभेस उपस्थिती  इ. सह जिल्हा परिषदेकडील योजना व  जिल्हा परिषदेने राबविलेल्या वैशिष्टपूर्ण उपक्रमांची माहिती याची पडताळणी करणेत आली होती.जि. प. च्या वैशिष्टपूर्ण उपक्रमांमध्ये  पर्यावरण पुरक गणेशोत्सव, पंचगंगा नदी प्रदुषण मुक्त करणे , स्वच्छ भारत मिशन, डिजीटल शाळा, स्वच्छ विद्यालय पुरस्कार,‍ ‍शिंगणापुर निवासी क्रिडा प्रशाला, रेकॉर्ड  सॉर्टींग अंतर्गत्‍  डिजीटल रेकॉर्ड रुम, दिव्यांग उन्नती अभियान, बायोगॅस,  आधारवड, कॅन्सर सर्व्हेक्षण, महिला बचत गटांचे काम, घरकुल योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, वृक्ष लागवड, वॉटर एटीएम, आयएसओ पशुसंवर्धन दवाखाने  तसेच ‍शिगणापुंर निवासी क्रिडा प्रशाला, रेकॉर्ड  सॉर्टींग अंतर्गत्‍  डिजीटल रेकॉर्ड रुम इ. डॉक्युमेंटरी यांचे सादरीकरण करणेत आलेले होते.

पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार, यांच्या मार्फत पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2019 चा निकाल केंद्र शासनाकडील दिनांक 16-09-2019 च्या पत्रान्वये नुकताच जाहिर झाला आहे.  यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेने सादर केलेल्या नामांकनास राज्यामध्ये प्रथम पारितोषिक (प्रमाणपत्र व रक्कम रुपये 30 लाख  या स्वरुपात) मिळाले  आहे.

यासाठी जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष सौ. शौमिका अमल महाडिक, मा. उपाध्यक्ष श्री सर्जेराव पाटील, श्री अंबरिषसिंह घाटगे  सभापती अर्थ व शिक्षण समिती , श्री सर्जेराव पाटील-पेरीडकर सभापती आरोग्य व बांधकाम समिती, श्री विशांत महापुरे सभापती समाजकल्याण समिती, सौ वंदना मगदुम सभापती महिला व बालकल्याण समिती, गटनेते श्री अरुणराव इंगवले, पक्षप्रतोद श्री विजय भोजे व सर्व सन्मानीय जिल्हा परिषद सदस्य यांचे मार्गदर्शनाखाली व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अमन मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रवि शिवदास, प्रकल्प संचालक अजयकुमार माने, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रविकांत अडसूळ,  मुख्य लेखा  व वित्त अधिकारी संजय राजमाने, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, सर्व  खातेप्रमुख  व त्यांचा कर्मचारी  वर्ग या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून कोल्हापूर जिल्हा परिषदेस प्रथम क्रमांक प्राप्त होण्यास सहभाग लाभला.

या पूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेस पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्रथम पारितोषिक सन  2014-2015 मध्ये मिळाला होता.

जिल्ह्यामध्ये हागणदारीमुक्तीसाठी विशेष मोहीम 

(अद्याप शौचालय सुविधा नसलेल्या कुटुंबांनी  पंचायत समितीशी संपर्क साधावा.)

कोल्हापूर : दिनांक ११.०९.२०१९

                                 केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाकडून देशाच्या ग्रामीण भागामध्ये संपूर्ण स्वच्छता व हागणदारीमुक्तीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत योजनेसाठी जे निकष आहेत त्याप्रमाणे पात्र परंतु, त्या कुटुंबाचे यापूर्वी करण्यात आलेल्या कोणत्याही सर्व्हे / यादीमध्ये नाव समाविष्ट नाही, तसेच सद्यस्थितीत शौचालय सुविधा उपलब्ध नसलेल्या व अद्याप कोणत्याही योजनेतून शौचालय बांधकामासाठी अनुदान घेतलेले नाही अशा पात्र कुटुंबांचा या विशेष मोहिमेमध्ये समावेश होणार आहे.

                                याप्रमाणे पात्र कुटुंबांनी स्वतःहुन वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्याबाबतची मागणी आपल्या संबंधित पंचायत समितीकडे सादर करावी असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.

 

(प्रियदर्शिनी च. मोरे )

उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पा. व स्व.)

जिल्हा परिषद कोल्हापूर

राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर येथे निवासी महिला रेक्टर कंत्राटी नेमनेबाबत जाहिरात

राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर येथे निवासी महिला रेक्टर कंत्राटी नेमनेबाबत जाहिरात 

पूरग्रस्त गावांना स्वच्छतेसाठी निधी (स्वच्छता आणि घनकचरा – सांडपाणी व्यवस्थापनासाठी गावांना मिळणार निधी )

कोल्हापूर : दिनांक – १५ ऑगष्ट  २०१९

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील  ग्रामपंचायतीमध्ये बऱ्याच ठिकाणी घनकचरा, मलबा, ओला कचरा व सांडपाणी जमा झाला आहे. या गंभीर परिस्थिती मध्ये गावामध्ये वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्य तसेच स्वच्छतेचे महत्व लक्ष्यात घेऊन विखुरलेला कचरा गोळा करून, कच-याचे वर्गीकरण तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या अनुषंगाने करावयाच्या बाबीकरिता शासनाकडून पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत निधी वितरित करण्यात आला आहे .

या ग्रामपंचायतींना सन २०११ च्या जनगणनेनुसार १००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या गावांना रु ५०,०००/- आणि  १००० पेक्ष्या जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना रुपये १,००,०००/- विशेष बाब म्हणून निधी प्राप्त झाला आहे. प्राप्त निधी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर मार्फत घोषित केलेल्या पूरग्रस्त गावांना स्वच्छतेच्या कामासाठी दिला जाणार आहे.

या निधी अंतर्गत ग्रांमपंचायत स्तरावर खालील प्रमाणे स्वच्छेतेची कामे घेण्यात येणार आहेत.

१. गाव स्तरावरील स्वच्छेतेसाठी  लागणारे अतिरिक्त रोजंदारीवर मनुष्यबळ उपलब्ध करणे.

२. सार्वजनिक स्वच्छेतेसाठी लागणारे साहित्य खरेदी करणे. (धुरळणी , धूर फवारणी, निर्जंतुकीकरण साधनांद्वारे स्वच्छता करणे. इत्यादी )

३. घनकचरा आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे .

४. आवश्यक साधने भाड्याने घेणे.

५. स्वच्छतेसाठी आवश्यक कामे करणे.

वरील प्रमाणे आवश्यक कार्यवाही करून लोकांच्या आरोग्याबाबत दक्षता घ्यावी. या कामामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही व आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्व ग्रामपंचायतींनी दक्षता घ्यावी असे आवाहन मा. श्री. अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी केले आहे.

(प्रियदर्शिनी चं. मोरे )

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा. व स्व.)

जिल्हा परिषद कोल्हापूर

पूर ओसरल्यानंतर साथ प्रतिबंधासाठी आरोग्य विभाग सज्ज : डॉ अर्चना पाटील, संचालक

सध्या कोल्हापूर जिल्हयामध्ये अभूतपूर्व आशी पूरपरस्थिती निर्माण झाली आहे. पूरपरस्थिती नंतर साथरोग प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाचा आढावा माननीय संचालक, आरोग्य सेवा माननीय डॉ अर्चना पाटील यांनी घेतला. महापूर ओसरल्यानंतर साथ रोग प्रतिबंधासाठी करावयाच्या कार्यवाही बाबत मागदर्शन व आढावा घेण्यात आला. या प्रसंगी सहसंचालक आरोग्य सेवा (हिवताप) डॉ भोई, उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर मा. डॉ बिलोलीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ बी. सी. केम्पीपाटील सहाय्यक संचालक, कुष्ठरोग डॉ प्रकाश पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाहयसंपर्क) डॉ हर्षला वेदक, प्राचार्य आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केद्र डॉ सुप्रिया देशमुख, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ उषादेवी कुंभार, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ देसाई, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ विनोद मोरे, साथ रोग तज्ञ डॉ तावशी सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
1) प्रभावी साथ प्रतिबंधासाठी पूरग्रस्त शिरोळ, हांतकणगंले, करवीर, कागल, राधानगरी, चंदगड, पन्हाळा या तालुक्यासाठी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी व जिल्हास्तरीय पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली असून नोडल अधिकारी व तालुका आरोगय अधिकारी यांनी समन्वय ठेवून साथ प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा देणेचे आहे. पन्हाळा- डॉ उषादेवी कुंभार, राधानगरी- डॉ देसाई, शिरोळ- डॉ वेदक, हांतकणंगले- डॉ पी आर पाटील, कागल- डॉ सुवर्णा पाटील, करवीर- डॉ फाळके, चंदगड- डॉ व्ही .ए मोरे
2) साथरोग प्रतिबंधासाठी गृहभेटी व्दारे सर्व्हेक्षण, पाणी शुध्दीकरण, उपचार, अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी पूरग्रस्त तालुक्यात आरोग्य सेवक व आशा यांची प्रतिनियुक्ती काढण्यात आली आहे.
3) पूरबाधीत क्षेत्रामध्ये आरोग्य विषयक सेवा देणेसाठी इतर जिल्हयातील वैद्यकीय अधिकारी यांना जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मार्फत पूरग्रस्त क्षेत्रातील प्राथमिक आरोगय केद्रांमध्ये नियुक्ती देण्यात येणार आहे. तसेच विशेष तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांना जिल्हा शल्यचिकित्सक मार्फत ग्रामीण रुग्णालय येथे पूरग्रसतासाठी तज्ञ वै्द्यकीय सेवा उपब्लध असणार आहे.
अ.नं
इतर जिल्हयाचे नांव
संख्या
नेमणूक तालुका
1
लातूर
4
हांतकणगले
2
अहमदनगर
8
शिरोळ
3
उस्मानाबाद
4

4
नाशिक
9
करवीर
5
सातारा
4
शिरोळ
4) तसेच पूरग्रस्त तालुक्यातील आर.बी.एस.के. पथक तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मागदर्शनाखाली वैद्यकीय सुविधा देणार आहे.
5) नगरपालिका क्षेत्रामध्ये इचलकरंजी, कुरुंदवाड, पेठवडगांव, गडहिंग्लज कागल या ठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सक मार्फत पूरग्रस्तासाठी विशेष आरोगय शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.
6) पुरेसा औषध साठा उपलब्ध करण्यात आलेला आहे. तथापि सनियंत्रणासाठी मंडळ स्तरावर मध्यवर्ती औषध भांडार ची स्थापना करण्यात आलेली आहे. त्या मार्फत मागणी, खर्च, पुरवठा इ. सनियंत्रणाचे कामकाज औषध निर्माण अधिकारी पाहतील.
7) पूरगस्त भागातील दैनदिनं अहवाल प्राप्त करुन घेणे, अहवाल पृथ:करण करणे, (EPIDEMIOLOGICAL ANALYSIS) एक‍त्रिकरण, सादरीकरण, इ मेल करणे इ काम जिल्हा एकात्मिक रोग सर्व्हेक्षण कक्षा मार्फत करण्यात येणार आहे.

 

प्रसव वेदना,पुराचे थैमान आणि शासकीय यंत्रणाचा समन्वय: माता व नवजात बालक सुखरुप

प्रसव वेदना सुरु झाल्याने  साखरी ता गगनबावडा येथील गरोदर माता नीता रामचंद्र खंदारे ही दि. 30 जुलै 2019 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसुतीसाठी दाखल झाली. पाच वाजेपर्यंत वैद्यकीय अधिकारी व परिचारिका प्रसुती सुखरुप होणेसाठी प्रयत्न करीत होते.  परंतु पावसाचा जोर वाढत असल्यामुळे पूरपरिस्थिती गंभीर होण्याची स्थिती निर्माण झाली होती.  अशा परिस्थतीमध्ये  मातेची स्थिती गंभीर होण्याचा धोका असल्यामुळे व प्राथमिक आरोगय केंद्रामध्ये अत्याधुनिक यंत्रणा नसलेमुळे वैद्यकीय अधिकारी यांनी पुढील उपचारासाठी कोल्हापूरला संदर्भीत करण्याचा निर्णय घेतला.

कोल्हापूर गगनबावडा मार्गावर लोंघे-किरवे दरम्यान 200 मीटर लांब रस्त्यावर पाणी होते. परिस्थतीचे गांभिर्य  ओळखून वैद्यकीय अधिकारी यांनी जिल्हा अपत्ती नियंत्रण कक्ष, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ फारुख देसाई  यांना कळविले त्यांनी जिल्हासाथ रोग कक्षातील कार्यरत श्री संजय सोनवणे यांना माहिती देवून निवडे व कळे प्रा आ केद्राकडे संपर्क साधला.  त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा क्षणांचाही विलंब न लावता यंत्रणा कार्यान्वीत झाल्या. गगनबावडा  पोलिसांचे पथक  प्राथमिक आरोग्य निवडे येथे तत्काळ पोहचले.  108 ॲम्ब्युलन्स चे  वैद्यकीय अधिकारी डॉ मानाजी पाटील, पो.नि. श्री चौगले, पो कॉ. वीर , प्रा आ केंद्राकडील वै.अ. डॉ कारंडे, आरोग्य सहाय्यक श्री अरुण मेथे,  आरोगय सेवक संभाजी दुर्गुळे,  ढेळेकर यांच्या मदतीने गरोदर मातेस 108 ॲम्ब्युलन्स मधून किरवे गावाजवळ आणले. तेथून स्टे्रचर वरुन सुमारे 200 मीटर अंतर कमरे एवढया पाण्यातून लोघे  येथे आणले . तेथे कळे ता पन्हाळा स पो नि इंगवले अधिच 108 ची ॲम्ब्युलन्स सह उपस्थित होते. गरोदर मातेची पुन्हा एकदा प्राथमिक आरोग्य कळे ता पन्हाळा येथे तपासणी करण्यात आली त्यानंतर जिल्हा रुग्णालय कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

जिल्हा अपत्ती कक्ष , जिल्हा पोलिस यंत्रणा , 108 ॲम्ब्युलन्स सेवा, प्राथमिक आरोग्य केंद्र निवडे, कळे कडील अधिकारी कर्मचारी, यांच्या संर्तकते मुळे सर्व शासकीय यंत्रणाच्या समन्वयामुळे या गरोदर मातेची सुखरुप सुटका झाली असून या गरोदर मातेने मुलास जन्म दिला असून बाळ व बाळंतीण यांची प्रकृती चांगली आहे. या मोहिमेत मध्ये सर्व सहभागी अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन व कौतुक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा. सौ. शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अमन मित्त्ल, आरोग्य सभापती श्री सर्जेराव पाटील पेरीडकर यांनी केले आहे असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ साळे योगेश यांनी सांगितले.

 

 

जिल्हा परिषद, कोल्हापूर विधीज्ञ पॅनेलवर विधीज्ञ नियुक्तीसाठी अर्ज मागणी जाहिरात सन 2019-20

जिल्हा परिषद, कोल्हापूर  विधीज्ञ पॅनेलवर विधीज्ञ नियुक्तीसाठी अर्ज मागणी जाहिरात सन 2019-20