पुणे विभागीय विक्री प्रदर्शन दक्खन जत्रा पुणे – २०१७

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,जिल्हा परिषद कोल्हापूर

पुणे विभागीय प्रदर्शन 2017

महिला स्वयंसहाय्यता समुहंानी उत्पादीत केलेल्या वस्तूंचे पुणे विभागीय विक्री प्रदर्शन दख्खन जत्रा- पुणे 2017 दि.27 ते 31 मार्च 2017 या कालावधीमध्ये गणेश कला क्रिडामंच,  स्वारगेट, पुणे येथे आयोजित करणेत आले आहे. कोल्हापूर जिल्हयामध्ये ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगीण विकास होणेच्या उद्देशाने स्वयंसहाय्यता महिला बचत गटांची चळवळ हा एक प्रभावी मार्ग ठरला असून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांनी उत्पादन केलेल्या वस्तंूना बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून विभागीय प्रदर्शन प्रत्येक वर्षी  विभागातील 5 जिल्हयापैकी 1 जिल्हयामध्ये आयोजित करणेत येते त्याचा चंागला उपयोग समुहातील महिलंाना नक्कीच होतेा.

पुणे विभागीय प्रदर्शनसाठी कोल्हापूर जिल्हयातुन 10 महिला स्वयंसहाय्यता समुह पाठविणेत आलेले आहेत. त्यापैकी 3 समुह कोल्हापुरी तंाबडा/पंाढरा रस्सा तसेच कोल्हापूरी शाकाहारी/मंासाहारी जेवण तयार करतात, 1 समुह नाष्टा तयार करणेचे काम करतो. याबरोबर पेढे,बर्फी, व विविध प्रकारच्या चटण्या व गावरान कडधान्य, कोल्हापुरी चटणी मसाला, मातीची भंाडी, बेदाणे, मध, आयुर्वेदिक औषधे (मुठळा), आईल पंप/ पेस्ट कंट्रोल असे उत्पादन असलेले वस्तुचे 6 समुह पाठविणेत आलेले आहेत. /

सदर 10 समुहातील महिलंाना ॲानलाईन विक्रीसाठी मोबाईल ॲप उाऊनलोड करुन त्याचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण देणेत आलेले आहे, याचा उपयोग करुन या समुहातील महिला त्यांच्या मालाची ऑन लाईन विक्रीही करु लागल्या आहेत. तसेच प्रदर्शन ठिकाणी 5 समुह मोबाईल ॲपचा वापर करत आहेत.

 

गुढी पाडवा पट नोंदणी २०१७

कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा” या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी

 

कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत जि. प च्या शाळांमध्ये राबविणेत आलेल्या “गुढी पाडवा-शाळा प्रवेश वाढवा” या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. सर्वेक्षणानुसार आढळलेल्या दाखलपात्र (6+) वयोगटातील जवळपास 68 टक्के बालकांची पटनोंदणी गुढी पाडव्या दिवशीच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा नजीकच्या कालावधीत विद्यार्थी संख्येने समृध्द होण्याची आशा निर्माण झाली आहे.

सन 2017-18 या शैक्षणिक वर्षाकरीता जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांमार्फत पटनोंदणीचे सर्वेक्षण करणेत आले. या सर्वेक्षणामध्ये 6+ वयोगटातील दाखलपात्र मुले 15151 मुली 13179 अशी एकूण 28330 बालके आढळून आली. त्यापैकी गुढी पाडव्या दिवशीच 9968 मुले 9182 मुली अशी एकूण 19150 बालके जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल झालेली आहेत. तसेच दाखलपात्र वयोगटातील उर्वरित बालके शैक्षणिक सत्र सुरु होईपर्यंत जि. प च्या शाळांमध्येच दाखल होणे अपेक्षित आहे. “गुढी पाडवा-शाळा प्रवेश वाढवा” कार्यक्रम जिल्हा परिषद शाळांमध्ये यशस्वी होणेकामी पदाधिकारी, अधिकारी व शिक्षक यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत मागील तीन वर्षांपासून “गुढी पाडवा – शाळा प्रवेश वाढवा” हा अभिनव उपक्रम राबविणेत येतो. गतवर्षीपेक्षाही या उपक्रमास यावर्षी चांगला प्रतिसाद लाभलेला दिसून येतो. यावर्षी जिल्हा परिषद शाळांमार्फत दाखलपात्र बालकांच्या गृहभेटी, शाळांची रंगीत जाहिरात पत्रके, दुरध्वनी व एस.एम.एस.व्दारे पालकांचे उद्बोधन अशा पद्‌धतीने व्यापक जनजागृती करणेत आली. याशिवाय जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविणेत येणा-या विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे शालेय कामात समाजाचे सहकार्य वाढत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दाखल होणाऱ्या बालकांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शालेय पोषण आहार तसेच तज्ञ व अनुभवी शिक्षकांमार्फत गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात असून जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल करावे असे आवाहन करणेत येत आहे.

अ. क्र. गटाचे नंाव सर्व्हेक्षणानुसार 6+ वयोगटातील दाखलपात्र संख्या   पैकी गुढीपाडव्यादिवशी  दाखल  विद्यार्थी संख्या दाखल टक्केवारी (दाखलपात्र संख्येशी)
मुले मुली एकूण मुले मुली एकूण
1 आजरा 513 488 1001 368 370 738 73.73
2 भुदरगड 746 665 1411 667 622 1289 91.35
3 चंदगड 1007 1064 2071 844 895 1739 83.97
4 गडहिंग्लज 977 861 1838 623 535 1158 63.00
5 गगनबावडा 255 229 484 241 217 458 94.63
6 हातकणंगले 2132 1855 3987 777 724 1501 37.65
7 कागल 1370 1119 2489 963 810 1773 71.23
8 करवीर 2706 2135 4841 1542 1331 2873 59.35
9 पन्हाळा 1521 1341 2862 1124 1054 2178 76.10
10 राधानगरी 1428 1210 2638 1080 951 2031 76.99
11 शाहुवाडी 1077 1029 2106 979 929 1908 90.60
12 शिरोळ 1419 1183 2602 760 744 1504 57.80
  एकूण 15151 13179 28330 9968 9182 19150 67.60

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत – जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्राम सेवकांचा सत्कार

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हयात उत्कृष्ट काम करणा-या ग्राम सेवकांचा सत्कार

(जिल्हा समन्वय सभेत जिल्हयातील 4 ग्रामसेवकांचा गौरव )

कोल्हापूर : दि. 9/3/2017

 

      जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत आज रोजी समन्वय सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेमध्ये जिल्हयात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत -उत्कृष्ट काम करणा-या ग्राम सेवकांचा मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गौरव केला.

सर्वच विषयांचा आढावा घेण्यासाठी आयोजित या बैठकीमध्ये सर्व खातेप्रमुख आणि गटविकास अधिकारी उपस्थित होते.पाणी व स्वच्छता विभागाचा ही आढावा घेताना जिल्हयातील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उत्कृष्ट काम करणारे ग्राम सेवक श्री.के.पी.पोवार, ग्राम पंचायत कोलीक, ता.पन्हाळा यांनी शौचालय बांधकामसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजार भोगाव येथील हार्डवेअर दुकानदारास स्वत:  र.रू.50000/- देवून साहित्य खरेदी केले आणि बांधकामासाठी शेजारच्या गावातून 10 गवंडी गोळा करून 100 % शौचालय बांधकाम पूर्ण केले.तसेच ग्राम सेवक श्री.पोपट जगताप,ग्रामपंचायत,पोंंबरे,ता.पन्हाळा यांनी देखील बांधकामासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी र.रू.10000/- हार्डवेअर दुकानदारास स्वत: दिले तर या ग्राम पंचायतीच्या सरपंचांनी साहित्य खरेदीसाठी चेन गहान टाकून लाभार्थ्यांना साहित्य खरेदी करून दिले व गाव 100%हागणदारीमुक्त केले.  दुर्गम भाग असून देखील गावक-यांना शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या ग्राम सेवकांनी केलेल्या कामाचा गौरव या आढावा सभेत करण्यात आला.

ग्राम पंचायत पटट्ण कोडोली,ता.हातकणंगले या ग्राम पंचायतीचे उदद्ीष्ट 1200 पेक्षा जास्त होते.या उदद्ीष्टपूर्तीसाठी हे गाव मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दत्तक घेतले होते. ग्राम सेवक श्री.एस.पी.कांबळे,यांनी नियोजनबध्द काम करून ही ग्राम पंचायत  हागणदारीमुक्त केली.या बदद्ल त्यांचा सत्कार देखील मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केला.

ग्राम पंचायत आगरभागचे ग्राम सेवक श्री.सी.एम.कांबळे ,ता.शिरोळ यांनी   आपली ग्राम पंचायत हागणदारीमुक्त केली शिवाय त्यांनी गावात निर्माण होणा-या सांडपाण्याला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी गावामध्ये नांदेड पॅटर्नचे 350 शोषखडडे् तयार केले आहेत.या कामास सुरूवातील ग्रामस्थांकडून तक्रारी झाल्या ,कामास विरोध झाला पण हे काम त्यांनी यशस्वी केले. यावेळी सर्व ग्रामसेवकांनी मनोगत व्यक्त करून शौचालय उदद्ीष्टपूर्तीसाठी केलेल्या कामाबाबत माहिती सांगितली. मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी   ग्रामसेवकांचा गौरव करून सर्व तालुक्यात याप्रमाणे उदद्ीष्टपूर्ती करणेबाबत सर्व गटविकास अधिकारी यांना सूचना दिल्या.

या आढावा बैठकीसाठी जिल्हयातील हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील सर्वात जास्त उदद्ीष्ट असणा-या 10 ग्राम पंचायतींना देखील आढाव्यासाठी उपस्थित होत्या.(ग्रा.पं.हेर्ले- 222,रेंदाळ-266,रूकडी-301,कबनूर-317,शिरोली-361,हुपरी- 422,ता.हातकणंगले,ग्रा.पं.शिरोळ-315,अब्दुल लाट- 448,दानोळी-223,ता.शिरोळ) या सर्व ग्राम पंचायतींना  माहे,मार्च अखेर गावे हागणदारीमुक्त करण्याबाबत  मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेशित केले आहे.

पुणे विभागीय प्रदर्शन 2017

पुणे विभागीय प्रदर्शन 2017

महिला स्वयंसहाय्यता समुहंानी उत्पादीत केलेल्या वस्तूंचे पुणे विभागीय विक्री प्रदर्शन दख्खन जत्रा- पुणे 2017 दि.27 ते 31 मार्च 2017 या कालावधीमध्ये गणेश कला क्रिडामंच,  स्वारगेट, पुणे येथे आयोजित करणेत आले आहे. कोल्हापूर जिल्हयामध्ये ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगीण विकास होणेच्या उद्देशाने स्वयंसहाय्यता महिला बचत गटांची चळवळ हा एक प्रभावी मार्ग ठरला असून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांनी उत्पादन केलेल्या वस्तंूना बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून विभागीय प्रदर्शन प्रत्येक वर्षी  विभागातील 5 जिल्हयापैकी 1 जिल्हयामध्ये आयोजितकरणेत येते त्याचा चंागला उपयोग समुहातील महिलंाना नक्कीच होतेा.

पुणे विभागीय प्रदर्शनसाठी कोल्हापूर जिल्हयातुन 10 महिला स्वयंसहाय्यता समुह पाठविणेत आलेले आहेत. त्यापैकी 3 समुह कोल्हापुरी तंाबडा/पंाढरा रस्सा तसेच कोल्हापूरी शाकाहारी/मंासाहारी जेवण तयार करतात, 1 समुह नाष्टा तयार करणेचे काम करतो. याबरोबर पेढे,बर्फी, व विविध प्रकारच्या चटण्या व गावरान कडधान्य, कोल्हापुरी चटणी मसाला, मातीची भंाडी, बेदाणे, मध, आयुर्वेदिक औषधे (मुठळा), आईल पंप/ पेस्ट कंट्रोल असे उत्पादन असलेले वस्तुचे 6 समुह पाठविणेत आलेले आहेत. /

सदर 10 समुहातील महिलंाना ॲानलाईन विक्रीसाठी मोबाईल ॲप उाऊनलोड करुन त्याचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण देणेत आलेले आहे, याचा उपयोग करुन या समुहातील महिला त्यांच्या मालाची ऑन लाईन विक्रीही करु लागल्या आहेत. तसेच प्रदर्शन ठिकाणी 5 समुह मोबाईल ॲपचा वापर करत आहेत.

मा अध्यक्षसो जि प यांचेकडून प्राप्त वृत्त प्रसिद्ध करणेबाबत

सर्वांना नमस्कार

मी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये दि. 21/03/2017 रोजी अध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारला त्याच दिवशी स्त्री भ्रूण हत्येविषयी परखड मत मांडलेले होते. स्त्री भ्रूण हत्येची मला अत्यंत चीड असून याबाबत मी कठोर कारवाई करणार आहे.म्हैशाळ जि.सांगली येथील घटनेपाठोपाठच नाशिक येथील शासकीय रूग्णालयामध्ये स्त्री भ्रूण हत्येचा प्रकार घडणे ही पूरोगामी महाराष्ट्रासाठी अत्यंत घृणास्पद घटना आहे. आजच्या युगात अशा प्रकारच्या घटना घडणे हे माझ्यासारख्या सुजाण नागरिकाला अत्यंत खेददायक आहे या प्रकाराचा मी अत्यंत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते. मी स्वत: जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्याने या प्रकारच्या घटना कोल्हापूर जिल्हयामध्ये घडू नयेत यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, सी.पी.आर व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर तसेच सर्व संबंधित आरोग्य विषयक घटकांना कडक सूचना देणार आहे.

 

आपल्या विश्वासू,

(सौ. शौमिका अमल महाडिक)

अध्यक्षा,

जिल्हा परिषद कोल्हापूर

शाळासिध्दी गुणवत्तेची गुरूकिल्ली शाळासिध्दीत कोल्हापूर राज्यात अव्वल

   शाळासिध्दी गुणवत्तेची गुरूकिल्ली

शाळासिध्दीत कोल्हापूर राज्यात अव्वल

 

राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ (NUEPA) दिल्ली, तसेच मनुष्यबळ विकास मंत्रालय दिल्ली यांच्या नेतृत्वाखाली शालेय गुणवत्ता सुधारणेसाठी शाळासिध्दी तथा शाळा मानके व मूल्यांकनाचा राष्ट्रीय कार्यक्रम निर्माण केला आहे.या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याने दि. 30 मार्च 2016 रोजी शाळासिध्दी शासन निर्णय केला, ज्यायोगे राज्यातील सर्व शाळांनी शाळासिध्दी कार्यक्रम राबविणे अनिवार्य केले गेले. याचपाठोपाठ दि. 16 सप्टेंबर 2016 व 7 जानेवारी 2017 रोजी शाळासिध्दी साठी पूरक शासन निर्णय केले.प्रत्येक शाळेने त्यांच्या स्व-सुधारणेसाठी उपाय योजणे व त्यासाठी सक्षम पाऊल उचलणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. हा उद्देश साध्य करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी श्री. सुभाष चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केले आहेत.शासन निर्णयानुसार न्यूपा (NUEPA) दिल्ली यांनी ‘¿ÖÖôûÖ×ÃÖ¬¤üß’ नावाचे राष्ट्रीय संकेतस्थळ (www.shalasiddhi.org) निर्माण केले होते. या संकेतस्थळावर देशातील सर्व माध्यम, व्यवस्थापनाच्या सर्व शाळांनी स्वयंमूल्यमापन व रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक होते. दि. 28 फेब्रुवारी 2017 अखेर देशातील सर्व शाळांनी रजिस्ट्रेशन तसेच स्वयंमूल्यमापन करणे अपेक्षित होते. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व 3683 शाळांनी स्वयंमूल्यमापन केले आहे.

न्यूपाने दिलेल्या लिंकवर प्रत्येक शाळेने स्वत:चा युडायस कोड वापरून पासवर्ड क्रिएट करून रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यानंतर शाळासिध्दीच्या 7 मानकांनुसार 45 उपक्षेत्रात स्वत:च्या शाळेचे स्वयंमूल्यमापन 999 गुणांपैकी करावयाचे बंधनकारक केले होते. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सदर कार्यक्रमाच्या 7 मानकांनुसार तालुका, केंद्र व शाळानिहाय अंमलबजावणीचे भरीव नियोजन तथा ॲक्शन प्लॅन तयार केला. याचा पहिला टप्पा म्हणजे जुलै 2017 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राज्यनिर्धारक यांच्या सहकार्याने शिक्षणाधिकारी श्री. सुभाष चौगुले यांनी कोल्हापूर डाएट येथे प्रत्येक तालुक्यातून कृतीशील शिक्षकांची टीम तयार केली व या कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. यामध्ये शाळासिध्दीची 7 मानके व त्यानुसार उपक्रम व कार्यक्रम कसे विकसित करायचे यावर चर्चा केली. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातून मुख्याध्यापकांनी क्षेत्रनिहाय कोणते अभिलेख ठेवायचे, तसेच पुरावे ठेवावयाचे याचे मार्गदर्शन गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत केले गेले.

कोल्हापूर जिल्ह्यातील 3683 पैकी 610 शाळा श्रेणीत आहेत. एकंदरीत राज्यभरातील सर्व जिल्ह्यांतील उपलब्ध शाळांपैकी श्रेणीतील शाळा असण्याचे कोल्हापूरचे शेकडा प्रमाण (16.55 %) हे राज्यात अव्वल असून कोल्हापूरने आणखी एकदा गुणवत्तेत आपले स्थान अधोरेखित केले आहे.

याचबरोबर जिल्ह्यातील 1012 शाळा या ‘ब’ श्रेणीत आहेत. उर्वरीत 919 ‘क’ श्रेणी व 628 ‘ड’ श्रेणीत आहेत.या स्वयंमूल्यमापनानंतर विद्या परिषद, पुणे यांचेकडून ‘अ’ श्रेणीतील शाळांचे बाह्यमूल्यमापन होणार असून त्यासाठी 2000 पेक्षा अधिक निर्धारक राज्यभरातून प्रशिक्षित केले आहेत. शाळा बदलून हे निर्धारक बाह्यमूल्यमापन करणार आहेत. ही प्रक्रिया दि. 10 एप्रिल नंतर करण्याचे नियोजित असून सदरचे आदेश त्याच दिवशी प्राप्त होतील.स्वयंमूल्यमापनात ज्या शाळा ‘अ’ श्रेणीत आहेत त्यांचेच बाह्यमूल्यमापन होईल. अशा प्रत्येक शाळेला निर्धारक भेट देऊन 2 दिवस पुरावे, अभिलेखे यांची पडताळणी करून तद्संबंधीचे गुणदान विद्या परिषदेकडे गोपनीय स्वरूपात संकेतस्थळावर देतील. यानंतर पात्र शाळांना SS2016 असे प्रमाणपत्र शासनाकडून दिले जाईल, ज्याची वैधता 5 वर्षे असेल. 5 वर्षांनंतर बदलता शिक्षणप्रवाह व गरजानुरूप 7 मानकांत बदल केले जातील व त्यावेळी पुन्हा असे मूल्यमापन करणे बंधनकारक राहील.एकंदरीत शाळासिध्दी या राष्ट्रीय मूल्यांकनाच्या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल राहील व शाहूंचा शिक्षण वारसा जोपासला जात आहे असेच चित्र दिसते. यासाठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुणाल खेमनार व शिक्षणाधिकारी श्री. सुभाष चौगुले यांचे मार्गदर्शन मिळाले असून सर्व उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे.

जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी भुदरगड येथे रोटरी मार्फत कार्यशाळेचे आयोजन

जिल्हा परिषद, कोल्हापूर  व  रोटरी क्लब ऑफ सनराईज ,कोल्हापूर  यांच्या संयुक्त विदयमाने  “रचनावाद- एक नवी दिशा या कार्यशाळेचे आयोजन ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, मौनी विदयापीठ, गारगोटी, ता.भुदरगड येथे दि.27/03/2017 इ.रोजी करणेत आले होते. या कार्यशाळेच्या  उद्घाटन प्रसंगी प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले म्हणाले, “बालकाच्या प्रगतीच्या दृष्टीने     ज्ञानरचनावादी पध्दतीचे शिक्षण आवश्यक आहे. प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी कृतीयुक्त अध्यापनाद्वारे प्रयत्न करणे आवश्यक आहे. रचनावाद समजून वर्गातील प्रत्येक बालक प्रगत करणेसाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. बालकाला समजून घेताना त्याचे बालमानसशास्त्र समजून घेणे, मानवी मेंदूची रचना समजून घेणे आवश्यक आहे. रोटरीच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेसाठी  TEACH  या उपक्रमामधून राबविले जाणारे उपक्रम कौतुकास्पद आहेत.”

या कार्यशाळेत भूदरगड तालुक्यातील 166 शिक्षक, सर्व केंद्रप्रमुख यांना प्रशिक्षण देण्यात आले. श्रीमंत माईसाहेब बावडेकर संस्थेच्या अध्यक्षा नितूदेवी बावडेकर यांनी सहज सोप्या भाषेत रचनावाद, मेंदूचा विकास समजावून दिला. ज्ञानरचनावादाची संकल्पना तत्वे यामध्ये शिक्षकांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. गटकार्य अनौपचारिक चर्चा यातून रचनावादाचे महत्व त्यांनी अधोरेखीत केले.

कार्यशाळेचे उद्घाटन रोटरीचे प्रेसिडंट सचिव झंवर यांचे हस्ते करणेत आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी,भुदरगड दिपक मेंगाणे, जिल्हा शिक्षणविस्तार अधिकारी  दिपक कामत, ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरचे प्राचार्य अर्जून आबिटकर, रोटरी सेक्रटरी कालेकर,केदार कुंभोजकर ,शिशिर शिंदे, अशोक भोई हे उपस्थित होते. सुत्रसंचालन पी.डी.कांबळे यांनी केले.

सर्व शिक्षा अभियान, शिक्षण विभाग (प्राथ.), जिल्हा परिषद कोल्हापूर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, गगनबावडा, ता.गगनबावडा कडील रिक्त पदाची भरती

जाहिरात

 

 

सर्व शिक्षा अभियान, शिक्षण विभाग (प्राथ.), जिल्हा परिषद कोल्हापूर

 

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, गगनबावडा, ता.गगनबावडा कडील रिक्त  पदाची भरती

कोल्हापूर जिल्हयातील गगनबावडा गटामध्ये महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचेमार्फत नवोदय विदयालयाचे धर्तीवर कस्तुरबा गांधी बालिका विदयालय इयत्ता 6 वी ते 10 वी पर्यंत शिक्षण घेणा-या शाळाबाहय व अर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील मुलींसाठी निवासी स्वरुपात सुरू आहे. या विदयालयाच्या  वसतीगृहाकडील खालीलप्रमाणे  रिक्त पदे भरतीसाठी जाहिरात प्रसिध्द करणेत येत आहे.  सदरची पदे पूर्णपणे हंगामी स्वरुपाची असून कंत्राटी स्वरुपावर सहा महिने कालावधीसाठी भरणेत येणार आहेत.  नियुक्ती कालावधीत काम समाधानकारक असलेस पुढील नियुक्तीबाबत विचार करणेत येईल. कस्तुरबा गांधी बालिका विदयालयाकरीता नियुक्ती करणेत आलेल्या कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अर्हता / व्यावसायिक अर्हता व मासिक परिश्रमिक वेतन महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मंुबई यांनी निश्चित केलेप्रमाणे राहील.  त्याबाबत जे आदेश वरिष्ठ कार्यालयाचे प्राप्त होतील ते पाळणे संबंधितांना बंधनकारक राहील.

 अ. क्र. पदाचे नांव पदांची संख्या आरक्षण शैक्षणिक अर्हता अनुभव पारिश्रमिक (मानधन- कंत्राटी पद्धतीने)
1 गृहप्रमूख 1 खुला महिला बी.ए.बी.एड्./बी.एस्सी.बी.एड्.+2 वर्षाचा अनुभव 25000/-
2 लेखापाल 01 खुला महिला बी.ए./बी.कॉम+एम.एस.सी.आय.टी.+ मराठी टायपिंग 30 w.p.m. + इंग्रजी टायपिंग 40 w.p.m.

(बी.कॉम पदवीधर,संगणकाचे सखोल ज्ञान ü व लेखाविषयक कामकाजाचा किमान 1 वर्षाचा अनुभव असणा-या व्यक्तीस  प्राधान्य.)

7000/-
3 सहा.स्वयंपाकी 1 अनु.जाती महिला   साक्षर 4500/-
4 शिपाई 1 खुला महिला   सातवी पास 5000/-

 

सदर पदांच्या अटी शर्ती  

1) सदरचे पद कस्तुरबा गांधी बालिका विदयालयाच्या प्रकल्प कालावधी साठी पुर्णपणे हंगामी स्वरुपाचे असून सदर पदांस शासन सेवेचे नियम लागू  नाहीत.

2) सदर पदांवरील नेमणूक त्यांचे नावासमोर दर्शविलेप्रमाण्‌े एकत्रित पारिश्रमिकावर सहा महिन्याच्या कालावधीसाठी  करार पध्दतीने तात्पुरत्या स्वरुपाच्या करणेत येणार आहेत.

3) वयोमर्यादा दि. 01/04/2017 रोजी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे पुर्ण व कमाल वयोमर्यादा सर्वसाधारण

उमेदवारांसाठी 33 वर्षे व मागासवर्गीय उमेदवारांसाठी 38 वर्षे राहील.

4) आरक्षण प्रवर्गानुसार रिक्त पदांवर उमेदवार न मिळालेस सदर पदावर अन्य प्रवर्गातील उमेदवारांची निवड करणेचा

अधिकार  निवड समितीस राहील.

5) नियुक्त झालेल्या उमेदवारानी विहित  नमुन्यातील सेवा करारनामा करून देणे बंधनकारक राहील.

6) सदरचे विद्यालय निवासी स्वरूपाचे असलेने गृहप्रमूख पदासाठी  निवड झालेल्या उमेदवारांनी विद्यालयात निवासी

राहणे

बंधनकारक आहे. व अन्य पदासाठी  निवड झालेल्या उमेदवारांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक राहिल.

7) उमेदवारानी अर्ज मा. सदस्य सचिव, कस्तुरबा गांधी बालिका विदयालय निवड समिती, शिक्षण विभाग (प्राथ.), जिल्हा

परिषद, नागाळा पार्क, कोल्हापूर यांचे नावे  दि.10 /04/ 2017 पर्यत करणेचा आहे.

8) उमेदवारानी अर्जाच्या लखोटयावर पदाचे नाव व कस्तुरबा गांधी बालिका विदयालयाकडील रिक्त पदासाठी अर्ज असे

सुस्पष्टपणे नमूद करावे.

9)  अर्जासोबत प्रमाणपत्रांच्या छायांकित साक्षांकित प्रती जोडाव्यात.

10) निवड करणेबद्दलचे सर्व अधिकार निवड समितीस राहतील.

11) उमेदवारास लेखी परिक्षा अथवा  मुलाखतीस उपस्थित राहणेबाबत दैनिक भत्ता तसेच प्रवास भत्ता देय नाही.

12) सदर पदांसाठी देणेत आलेली जाहीरात अथवा मुलाखतीचा कार्यक्रम काही तांत्रिक अडचण उदभवल्यास स्थगित अथवा

रद्द करणेचा अधिकार निवड समितीस राहील. याबाबत कोणत्याही प्रकारची हरकत विचारात घेतली जाणार नाही.

ठिकाण :- कोल्हापूर

दिनांक :-   29 /03/2017.

 

 

 

सही/-                                                                         सही/-

     सचिव जिल्हा निवड  समिती                                                                अध्यक्ष जिल्हा निवड  समिती                                                                    कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय                                                      कस्तुरबा गांधी  बालिका विद्यालय,             गगनबावडा.  तथा शिक्षणाधिकारी (प्राथ.)                           गगनबावडा.  तथा जिल्हाधिकारी, कोल्हापूर

                                                                

                जिल्हा परिषद, कोल्हापूर

 

 

 

 

 

 

 

                                  आवेदन पत्राचा नमुना

सर्व शिक्षण अभियान,शिक्षण विभाग (प्राथमिक)जिल्हा परिषद कोल्हापूर

कस्तुरबा गांधी बालिका विदयालय गगनबावडा कडील रिक्त पदाच्या भरती बाबत

                                            अर्ज

सेवायोजनÖ कार्यालय

नोंदणीß क्रमांक

प्रति मा.सदस्य सचिव

कस्तुरबा गांधी बालिका विदयालय निवड समिती तथा

शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नांगाळा पार्क,कोल्हापूर

 

 

 

विषय कस्तुरबा गांधी बालिका विदयालय गगनबावडा कडील रिक्त पदाच्या भरती बाबत अर्ज

 

  • उमेदवाराचे नांव (देवनागरी)

आडनांव प्रथम ————————————————————————————————

  • लिंगÖ : पुरुष स्त्री
  • पत्रव्यवहाराचा पूर्ण पत्ता व मोबाईल नंबर:- ————————————————-

—————————————————————————————–

4) कायमचा पूर्ण पत्ता    : —————————————————————————————————————-

5) जन्मतारीख : अंकी

अक्षरी  ———————————————-

6) दिनांक :        01/04/2017          रोजी उमेदवाराचे वय –

वर्षे              महिने            दिवस

7) जात व प्रवर्ग :

8) विशेष आरक्षण असलेस

9) शैक्षणिक अर्हता :

अ.क्रं. उर्तीर्ण झालेली परिक्षा युनिर्व्हसिटी बोर्ड घेतलेले विषय मिळालेले शेकडा गुण उर्तीर्ण झालेले वर्ष
 

 

 

 

 

 

10) अनुभव :

ज्या संस्थेत काम केले आहे त्या संस्थेचे नांव कालावधी कामाचे स्वरूप शेरा
पासून पर्यंत
 

 

 

 

                                                                                                                                                                             प्रतिज्ञापत्र

वर नमूद असलेला तपशील माझ्या माहितीप्रमाणे बरोबर आहे. नमूद केलेली माहिती चुकीची अगर खोटी आढळलेस मी कारवाईस पात्र राहीन व माझी केलेली नेमणूक रद्द होईल याची मला पूर्ण जाणीव आहे.

 

 

                                                                                                                                                                                                                                        उमेदवाराची स्वाक्षरी नांव

 

सोबत खाली नमूद केलेल्या कागदपत्रांच्या प्रती जोंडलेल्या आहेत.

 

1) दहावी ,बारावी, पदवी,MSCIT,संगणक पदवी,अनुभव इ.गुणपत्रक व प्रमाणपत्राच्या  छायांकीत व स्वाक्षांकीत केलेल्या

प्रति

2) उमेद्वार मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र/जात वैद्यता प्रमाणपत्र आवश्यक.

आर.टी.ई. अंतर्गत 25 टक्के विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया – दुसरी फेरी

   आर.टी.ई. अंतर्गत 25 टक्के विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दुसरी फेरी

 

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांना सन 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 % पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. त्यानुसार सन 2017-18 या शैक्षणिक वर्षामधील 25% आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या लिंकवरील RTE Portal वर ऑनलाईन पध्दतीने राबविणेत येत आहे.

सदर प्रक्रियेअंतर्गत दि. 02/03/2017 अखेर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 1330 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी विद्यार्थी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी एकूण 1159 पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश  घेणेसाठी SMS ऑनलाईन प्रणालीद्वारे पाठविणेत आले होते. दि. 25/03/2017 इ. रोजी पहिली फेरी समाप्त झालेली असून पहिल्या फेरीअंती एकूण 524 विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतलेला आहे. 210 विद्यार्थी अपात्र ठरले असून 425 विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतलेला नाही.

दि. 30/03/2017 इ. रोजीपासून विद्यार्थी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू होत आहे. दुस-या फेरीसाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे पात्र 51 विद्यार्थ्यांची यादी निश्चित होऊन RTE च्या लिंकवर अपलोड करणेत आली आहे. तसेच सर्व पात्र 51 विद्यार्थ्यांना प्रवेश घेणेसाठी शाळेच्या नावासह SMS ऑनलाईन प्रणालीद्वारे परस्पर पाठविणेत आले आहेत. SMS प्राप्त झालेल्या पालकांनी संबंधित शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करावयाचा आहे. दुस-या फेरीतील विद्यार्थी प्रवेशासाठी अंतिम तारीख 08/04/2017 आहे. तरी दिलेल्या मुदतीत पालकांनी संबंधित शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. सुभाष चौगुले यांनी केले आहे.