इस्पुर्ली येथे कॅन्सर निदान शिबीर संपन्न

महाराष्ट्र राज्याचे महसुलमंत्री तथा कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री नाम.चंद्रकांत दादा पाटील आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सोै.शौमिका महाडिक यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत असलेल्या आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमणार व जिल्हा आरोग्य अधिकारी सौ.उषादेवी कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत करवीर तालुक्यामध्ये कॅन्सर निदान व चिकित्सा शिबीरांचे आयोजन करणेत आल्यानुसार जिल्हा परिषद कोल्हापूर व ॲपल सरस्वती हॉस्पीटल यांच्या विद्यमाने इस्पुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कॅन्सर शिबीर नुकतेच संपन्न झाले.

या शिबीराचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या सौ.संध्याराणी बेडगे (दिंडनेर्ली) यांच्या शुभहस्ते व पं.स.सदस्य श्री.रमेश चौगले (नंदगाव) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षानी जि.प.सदस्या सौ.शिल्पा पाटील (हसुर दुाा.) होत्या. प्रास्ताविकात तालुकाआरोग्य अधिकारी डॉ.डॉ.जी.डी.नलवडे यांनी करवीर तालुक्यातील 425 आशा स्वयंसेविकांच्या मार्फत फेब्रुवारी मध्ये घरोघरी भेटी देवून कॅन्सर विषयक सर्व्हेक्षणात 2710 संशयित रुग्ण आढळले असून यासर्वच रुग्णांची वैद्यकीय अधिका-यामार्फत प्राथमिक तपासणीनंतर तालुक्यात आयोजित करण्यात येत असलेल्या कॅन्सर निदान चिकित्सासाठी आयोजित 6 शिबीरातून तपासणी करणेत येणार आहे. आजपर्यत झालेल्या एकूण 3 शिबीरातंर्गत कॅन्सर विषयक विविध चाचण्या व तपासण्या करण्यायोग्य 87 रुग्णांची यादी करणेत आली असून या व उर्वरीत शिबीरातून अशा प्रकारच्या आढळणा-या रुग्णांची तपासणी व चाचणी ॲपल सरस्वती हॉस्पीटल आणि कोल्हापूर कॅन्सर सेंटर यांच्याकडे करणेत येऊन कॅन्सर उपचार कराव्या लागणा-या रुग्णांना 15000 पर्यत अनुदान देण्यात येणार असलेचे विषद केले.

ॲपल सरस्वती हॉस्पीटलचे कॅन्सर तज्ञ डॉ.निखील गुळवणी यांनी सद्याच्या युगात खाण्या-पिण्याच्या बदल्या सवयी,युवक आणि तरुणांमधील तंबाखु,मावा,गुटखा यांसारख्या व्यसनांचे वाढते प्रमाण,महिलांमधील आरोग्याच्या समस्यांमधील संकोचितपणा व होणारे दुर्लक्ष,सोशिकता तसेच त्यांच्यामधील वाढते मिसरीचे व्यसन प्रमाण तसेच रासायनिक खते आणि किटक नाशकांचा अतिरिक्त वापर यामुळे 1995 सालाच्या प्रमाणात कॅन्सरचे प्रमाण 200 पटीने वाढले असून यासाठी सर्वानींच एकत्र लढा देणे गरजेचे असून यासाठी जिल्हा नियोजन मंडळ आणि कोल्हापूर जिल्हा परिषद यांनी उचललेले पाऊल निश्चितच उपक्रमशिल आणि नाविन्यपूर्ण असून कॅन्सर रुग्णांना दिलासादायक असल्याचे नमूद केले.

या आरोग्य शिबीरात 263 रुग्णांनी नोंदणीद्वारे तपासणी करुन घेतली. कार्यक्रमास ॲपल सरस्वती हॉस्पीटलच्या व्यवस्थापक श्रीम.गीता आवटी व डॉ.पुष्कर कुलकर्णी,ग्राम पंचायत नागाव सरपंच सौ.नाईक,परिते सरपंच श्रीम.कारंडे,इस्पुर्ली उपसरपंच श्री.प्रदिप शेटे व दिंडनेर्ली उपसरपंच सौ.सुप्रिया पाटील,रुग्ण कल्याण समिती सदस्य डॉ.अनिल पाटील,इस्पुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सौ.खराडे- पाटील,विस्तार अधिकारी श्री.प्रदिप अष्टेकर,श्री.सुनिल जाधव तसेच इस्पुर्ली प्रा.आ.केंद्राकडील सर्व कर्मचारी वर्ग,आशा स्वयंसेविका मोठया संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य सेवक श्री.राहुल शेळके यांनी केले व आभार वैद्यकीय अधिकारी डॉ.शोभा भोई यांनी मानले.

डॉ.जी.डी.नलवडे

तालुका आरोग्य अधिकारी

पंचायत समिती करवीर

कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत “गुढी पाडवा – शाळा प्रवेश वाढवा” या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी

कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत जि. प च्या शाळांमध्ये राबविणेत आलेल्या “गुढी पाडवा-शाळा प्रवेश वाढवा” या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. सर्वेक्षणानुसार आढळलेल्या दाखलपात्र (6+) वयोगटातील जवळपास 67 टक्के बालकांची पटनोंदणी गुढी पाडव्या दिवशीच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झालेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा नजीकच्या कालावधीत विद्यार्थी संख्येने समृध्द होण्याची आशा आहे.

सन 2018-19 या शैक्षणिक वर्षाकरीता जिल्हा परिषदेच्या शाळांमार्फत पटनोंदणीचे सर्वेक्षण करणेत आले. या सर्वेक्षणामध्ये 6+ वयोगटातील दाखलपात्र मुले एकूण 28203 बालके आढळून आली. त्यापैकी गुढी पाडव्या दिवशीच एकूण 18843  बालके जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल झालेली आहेत.त्याची टक्केवारी 67 %    इतकी आहे.  तसेच दाखलपात्र वयोगटातील उर्वरित बालके शैक्षणिक सत्र सुरु होईपर्यंत जि. प च्या शाळांमध्येच दाखल होणे अपेक्षित आहे. “गुढी पाडवा-शाळा प्रवेश वाढवा” कार्यक्रम जिल्हा परिषद शाळांमध्ये यशस्वी होणेकामी पदाधिकारी, अधिकारी व शिक्षक यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत मागील चार वर्षांपासून “गुढी पाडवा – शाळा प्रवेश वाढवा” हा अभिनव उपक्रम राबविणेत येतो. गतवर्षीपेक्षाही या उपक्रमास यावर्षी चांगला प्रतिसाद लाभलेला दिसून येतो. यावर्षी जिल्हा परिषद शाळांमार्फत दाखलपात्र बालकांच्या गृहभेटी, शाळांची रंगीत जाहिरात पत्रके अशा पद्‌धतीने व्यापक जनजागृती करणेत आली. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दाखल होणाऱ्या बालकांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश,डिजीटल शाळा, शालेय पोषण आहार तसेच तज्ञ व अनुभवी शिक्षकांमार्फत गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात असून जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल करावे असे आवाहन करणेत येत आहे.

अ. क्र. गटाचे नाव 6+ वयोगटातील दाखलपात्र संख्या गुढीपाडव्यादिवशी  दाखल  विद्यार्थी संख्या दाखल टक्केवारी

 

1 आजरा 965 607 62.90
2 भुदरगड 1473 1200 81.47
3 चंदगड 1989 1492 75.01
4 गडहिंग्लज 1713 1044 60.95
5 गगनबावडा 520 477 91.73
6 हातकणंगले 4015 2024 50.41
7 कागल 2535 1657 65.36
8 करवीर 4978 2873 57.71
9 पन्हाळा 2783 2123 76.28
10 राधानगरी 2528 1706 67.48
11 शाहुवाडी 1954 1701 87.05
12 शिरोळ 2750 1939 70.51
  एकूण 28203 18843 67.00

                                                                                   

                                                                                                                               शिक्षणाधिकारी (प्राथ.)

                                                                                                      जिल्हा परिषद कोल्हापूर

गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा उपक्रम अंमलबजावणीचे‍ नियोजन

*कोल्हापूरजिल्हापरिषदेमार्फतगुढीपाडवा -शाळाप्रवेशवाढवाकार्यक्रमअंमलबजावणीचेनियोजन*

 

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत प्राथमिक शिक्षणाचा हक्क प्रदान झालेला आहे. या अनुषंगाने ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांची पटनोंदणी नियमित शाळेत होणे आवश्यक असते. यास अनुसरून कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत मागील ४ वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा हा अभिनव उपक्रम राबविणेत येत आहे. गुढी पाडवा हा हिंदू नववर्षातील प्रथम दिन असून नवीन कार्य सुरू करणेसाठी शुभदिन समजला जातो. या दिवशीच पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत निश्चित करावा या उददेशाने गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा हा उपक्रम जिल्हा परिषदेमार्फत राबविणेत येत आहे. या उपक्रमांतर्गत ६ ते १४ वयोगटातील दाखलपात्र मुलांचे सर्वेक्षण करणे, दाखलपात्र मुलांची यादी तयार करून ती गाव / शाळेच्या दर्शनी भागात लावणे, शाळेची जाहिरातपत्रके तयार करून पालकांना वितरीत करणे, विविध माध्यमांदवारे शाळांची जाहिरात करणे असे उपक्रम राबविणेच्या सुचना सर्व शाळांना देणेत आलेल्या आहेत. या उपक्रमाची फलश्रुती म्हणून दरवर्षी गुढी पाडव्यादिवशीच जास्तीत जास्त मुलांची पटनोंदणी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये होत असलेचे दिसून येत आहे.

प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी राबविणेत येणाऱ्या सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमाची तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ज्ञानरचनावादी शाळा, कृतीयुक्त अध्ययन पद्धती (ABL), डिजीटल शाळा, ISO शाळा मानांकन अशा उपक्रमांची जिल्ह्यामध्ये प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. १००% पटनोंदणी, नियमित उपस्थिती तसेच गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, माध्यान्ह भोजन योजना, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची इस्त्रो केंद्र भेट अशा विद्यार्थी हिताच्या विविध योजना शाळांमध्ये राबविणेत येत आहेत. शासकीय तसेच जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधील विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा लोकाभिमुख होणेस मदत झालेली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वतोपरी योगदान देत आहेच, त्याला समाजाचीही साथ मिळण्याच अपेक्षा या आवाहनाव्दारे करणेत आलेली आहे.

गुढी पाडव्यादिवशी आपल्या दाखलपात्र (६ वर्षे पूर्ण असणा-या) बालकाचा प्रवेश कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळेत निश्चित करून आपल्या पाल्याचे भवितव्य उज्वल करणेची संधी जिल्हा परिषदेच्या शाळांना द्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमनार, शिक्षण समिती सभापती श्री.अंबरिषसिंह घाटगे व प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री.सुभाष चौगुले यांनी आवाहन केले आहे.

 

 

                                                                                                            शिक्षणाधिकारी(प्राथ.)

                                                                                                            जिल्हापरिषदकोल्हापूर

 

जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या विमान प्रवासासह इस्रो भेटी साठी शुभेच्छ समारंभ

जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या विमान प्रवासासह इस्रो भेटी साठी शुभेच्छ समारंभ

मा. शिरोलीत  कॅन्सररुग्ण तपासणी शिबीर

जिल्हा नियोजन समिती  अनुदानातून  मा. श्री. चंद्रकांत पाटील, पालक मंत्री , मा. सौ. शौमिका महाडिक, अध्यक्षा यांच्या संकल्पनेतून  व मा. डॉ कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. कोल्हापूर यांच्या मागदर्शनाखाली राबविण्यात येणारी नाविन्यपूर्ण योजना कॅन्सर रुग्ण तपासणी व कॅन्सर रुग्ण शोध मोहिम करवीर तालुक्यामध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आशा स्वयंसेविकेना कॅन्सर बाबतचे मूलभूत प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर सर्व प्रा.आ.केद्रांच्या कार्यक्षेत्रातील  गांवामध्ये आशा मार्फत सव्हेक्षण करण्यात आले होते.  आशा स्वयंसेविकांच्या सर्व्हेक्षणामधून निघालेल्या रुग्णांची तपासणी  प्राथमिक आरेाग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी यांनी केली असून त्यांच्या तपासणी मध्ये निघालेल्या संशयित रुग्णांची तपासणी  कोल्हापूर कॅन्सर हॉस्पीटल मार्फत करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत करवीर तालुक्यात एकुण चार शिबीरे घेण्यात आलेली आहे. मुडशिंगी व इस्पुर्ली येथे लवकरत कॅन्सररुग्ण तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे.

कॅन्सर रुग्ण तपासणी शिबीर प्राथमिक आरोग्य केंद्र मा. शिरोली येथे दिनांक 13 मार्च 2018 रोजी घेण्यात आले या शिबीरराचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते यांच्याहस्ते करण्यात आला. या प्रसंगी आरोग्य समिती सदस्या मा. सौ. शिल्पा चेतन पाटील ,  पं.स. करवीरचे उपसभापती मा. श्री.विजय भोसले, पं.स. सदस्य  मा. राजे्‌ंद्र सुर्यवंशी, सौ. अश्विनी धोत्रे, सौ. सविता पाटील,  ग.वि.अ. श्री. सचिन घाटगे, शिरोलीेचे सरपंच सौ.रेखा कांबळे उपस्थित होते.

या प्रसंगी बोलतांना मा. सुभाष सातपुते म्हणाले की,  मुख कॅन्सर, गर्भाशय  कॅन्सर ,  स्तन कॅन्सर इ. प्रमाण वाढले असून कॅन्सरचे लवकर निदान होण्यासाठी या नाविन्यपूर्ण योजनेचा नक्कीच उपयोग होणार आहे.  आरोग्य समिती सदस्या मा. सौ. शिल्पा पाटील म्हणाल्या की, लोकांनी व्यसनापासून दूर राहणे,  नियमित व्यायाम, संतुलीत आहार, तणावापासून दूर  अशा प्रकारची जीवनशैली  स्वीकारावी असे नमुद करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविकात बोलतांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ नलवडे म्हणाले की, मा. कुणाल खेमनार, मु.का.अ व  डॉ. उषादेवी कुंभार, जि.आ.अ.  यांच्या मागदर्शनाखाली कृती आराखडा तयार करण्यात आला असून योजना व्यस्थितपणे तालुक्यात राबविण्यात येत आहे मा. शिरोलीतील शिबीरामध्ये 106 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून  19  इतक्या रुग्णंाना पुढील प्‌ुढील तपासणी साठी संदर्भित करण्यात आले आहे. उपस्थितांचे स्वागत डॉ. बामणीकर यांनी केले तर आभार डॉ. भोई यांनी मानले.

आर टी ई अंतर्गत २५ टक्के विद्यार्थी प्रवेशासाठी ऑनलाईन लॉटरी प्रक्रिया संपन्न

आर.टी.ई. अंतर्गत 25 टक्के विद्यार्थी प्रवेशासाठी ऑनलाईन लॉटरी प्रक्रिया संपन्न

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) (क) नुसार विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावरील शाळांमध्ये अपंग, अ.जा., अ.ज., वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली किंवा पूर्व प्राथमिक वर्गात (प्रथम प्रवेश स्तरावर) 25 टक्के प्रवेश राखीव ठेवणेची तरतूद आहे. त्यानुसार सन 2018-19 या शैक्षणिक वर्षासाठी कोल्हापूर जिल्हयामध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. सदर प्रक्रियेअंतर्गत 347 शाळांमधील 3501 जागांसाठी एकूण 2880 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ज्या शाळांना 25 % आरक्षित क्षमतेपेक्षा जादा अर्ज आलेले आहेत. अशा 70 शाळांसाठी शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, कोल्हापूरच्या वतीने शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन लॉटरी प्रक्रियेचे आयोजन मंगळवार दि. 13/03/2018 इ. रोजी दुपारी 1.00 वाजता शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृती भवन, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे करणेत आलेले होते. सदर लॉटरी प्रक्रियेला जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. सुभाष चौगुले, म.न.पा. प्रशासन अधिकारी                  श्री. विश्वास सुतार, विस्तार अधिकारी श्री. जे. टी. पाटील, श्रीम. जे. एस. जाधव, RTE पोर्टल ऑपरेटर श्री. एस. एम. खंडेपारकर, श्री. नचिकेत सरनाईक व अन्य कर्मचारी उपस्थित होते. तसेच लॉटरी प्रक्रियेसाठी पात्र असलेल्या शाळांचे प्रतिनिधी व पालकवर्ग उपस्थित होता.

सर्वप्रथम शिक्षणाधिकारी श्री. सुभाष चौगुले यांनी ऑनलाईन लॉटरी प्रक्रियेबाबत सर्व उपस्थितांना सविस्तर माहिती दिली व पालकांच्या शंकांचे निरसन केले. त्यानंतर उपस्थित पालकांमधून 3 लहान मुलींना स्टेजवर बोलावून त्यांचे हस्ते 3 स्वतंत्र बरण्यांमधील 0 ते 9 क्रमांकापर्यंतच्या चिठ्ठया काढणेत आल्या. सदर चिठ्ठयांचे क्रमांक शासनाच्या RTE पोर्टलवरील विहीत रकान्यात नोंदवून पूर्णपणे ऑनलाईन पध्दतीने लॉटरी प्रक्रिया पार पाडणेत आली. ही प्रक्रिया ऑनलाईन असलेने                        दि. 14/03/2018 इ. रोजी NIC सेंटरमधून लॉटरी लागलेल्या तसेच लॉटरी न लागलेल्या अशा सर्वच पालकांना मेसेज जातील. मात्र पालकांनी मेसेजवर अवलंबून  न राहता RTE वेबसाईटवरील SELECTED व NOT SELECTED या ठिकाणी जाऊन आपला फॉर्म नंबर लिहून खात्री करावी. ज्यांचे नाव NOT SELECTED मध्ये असेल अशा अर्जांसाठी प्रवेशाची पुढील फेरी काढण्यात येईल.ज्यांना लॉटरी लागल्याचा मेसेज येईल त्यांनी वेबसाईटवर जाऊन आपला भरलेला फॉर्म USER ID व पासवर्ड टाकून पुन्हा ओपन करावा. त्यामध्ये ADMID CARD या TAB वर क्लिक करावे आणि ज्या शाळा मिळाल्या असतील त्या शाळांच्या नावाची प्रिंट काढावी. पालकांनी सदरची प्रिंट व प्रवेशासंबंधीची सर्व कागदपत्रे घेऊन संबंधित शाळेत जावे व आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. पहिल्या फेरीतील विद्यार्थी प्रवेशाचा कालावधी दि. 14/03/2018 ते दि. 24/03/2018 असा आहे. सदर कालावधीत संबंधित पालकांनी शाळांमध्ये प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना पुढील फे-यांमध्ये पुन्हा संधी दिली जाणार नाही. त्यामुळे पालकांनी शाळा प्रवेशाच्या बाबतीत दक्ष राहून विहीत मुदतीत शाळेमध्ये प्रवेश निश्चित करावेत असे आवाहन         श्री. सुभाष रा. चौगुले शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केलेले आहे.

 

 

 

(श्री. सुभाष रा. चौगुले)

                                                                                  शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

                                                                            जिल्हा परिषद कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडील यशस्वी उपक्रमांचे देश पातळीवर दुस-यांदा सादरीकरण!!

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडील यशस्वी उपक्रमांचे देश पातळीवर दुस-यांदा सादरीकरण!!