दिनांक  23/07/2018 इ.रोजी  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरीबाबत.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती  जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे दि. 23/07/2018 रोजी सकाळी 11 वाजता साजरी करणेत आली. त्या प्रसंगी श्री.मधुकर पोवार,वरिष्ठ सहाय्यक (साप्रवि), श्री.विजय मगदुम,वरिष्ठ सहाय्यक (अतिमुकाअ स्वीय.सहा.) व श्रीम. सुरेखा खटावकर,कनिष्ठ सहाय्यक  (शिक्षण विभाग प्राथमिक)  यांचे हस्ते फोटो पूजन करणेत आले.

या प्रसंगी  उप मुख्य लेखा वित्त अधिकारी श्री. राहुल कदम यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या विचारांचे  व कार्याची माहिती थोडक्यात सांगितली. यावेळी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.सुषमा देसाई, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) श्री.रविकांत आडसुळ,उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) श्री.राजेंद्र भालेराव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बाक), श्री.सोमनाथ रसाळ, कार्यकारी अभियंता (ग्रापापु) श्री.एम.एस.बसर्गेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री.एस.एच.शिंदे, यांच्यासह व सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.

यावेळी श्रीम. जयश्री संजय जाधव विस्तार अधिकारी (शिक्षण) यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची माहिती व सुत्र संचलन केले. यावेळी मोठया संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

(रविकांत आडसुळ)

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)

जिल्हा परिषद, कोल्हापूर

RTE २५ % विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया 2018-19 अंतर्गत तिस-या प्रवेश फेरीसअंतिम मुदत वाढ

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांना सन 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 % पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. त्यानुसार सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामधील 25% आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या लिंकवरील RTE Portal वर ऑनलाईन चालू झालेली आहे.

सदर प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थी प्रवेशाच्या दोन फे-या पूर्ण झालेल्याअसून सध्या तिसरी प्रवेश फेरी चालू आहे. तिस-या फेरीतील प्रवेशासाठी निवडलेल्या 643 विद्यार्थ्यांची यादी RTE च्या लिंकवर अपलोड करणेत आलेली आहे. तसेच सदर विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेशासाठी शाळेच्या नावासह SMS ऑनलाईन प्रणालीद्वारे परस्पर पाठविणेत आले आहेत.SMS प्राप्त झालेल्या पालकांनी संबंधित शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करावयाचा आहे. त्यानुसार आज दिनांक 02/07/2018 पर्यंत एकूण 436 विद्यार्थ्यांनी RTE च्या 25 % आरक्षितकोट्यामध्ये प्रवेश घेतलेला आहे. 42 विद्यार्थ्याचे अर्ज कागदपत्रांच्या त्रुटींमुळे अपात्र ठरविणेत आलेले असून अद्याप 165 अर्ज प्रलंबित आहेत. तिस-या फेरीतील शाळा प्रवेशाची अंतिम तारीख पूर्वीच्या वेळापत्रकानुसार 02/07/2018 होती. मात्र पालकांच्या आग्रहास्तव प्रलंबित अर्जांचे प्रवेश निश्चित करणेसाठी दि. 08/07/2018 इ. रोजीपर्यंत शाळा प्रवेशाची मुदत वाढविणेत येत आहे.त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही.तरी दिलेल्या मुदतीत पालकांनी संबंधित शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी केलेले आहे.

 

 

sd/-

                                                                      शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

                                                                        जिल्हापरिषदकोल्हापूर

दिव्यांग उन्नती अभियान कार्यशाळा दि.30.6.18

दिव्यांग उन्नती अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळा बाबत.

दि. 26 जून 2018 इ. रोजी राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत “ दिव्यांग उन्नती अभियान “ ही नाविन्यपूर्ण योजना सुरु करण्यात आली. सदर योजनेची जिल्हास्तरीय कार्यशाळा आज दि. 30 जून 2018 इ. रोजी राजर्षि शाहू छत्रपती सभागृह, जि.प.कोल्हापूर येथे मा.सौ.शौमिका अमल महाडीक, अध्यक्ष, जि.प.कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

  • सदर प्रसंगी मा.सौ.शौमिका महाडीक, अध्यक्ष, जि.प.कोल्हापूर यांनी सदरचे अभियान संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ही जिल्हा परिषद प्रथम क्रमांकावर असेल आणि सदरचे अभियान सर्व पदाधिकारी यांना सोबत घेवून पूर्ण करण्यात येईल असे सांगून मनोगत व्यक्त केले.
  • मा.श्री.कुणाल खेमणार, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर अभियानातील अपंगत्वाचे 21 प्रकार ओळखण्यासाठी मार्गदर्शनपर सूचना केल्या.
  • मा.श्री.अंबरिषसिंह घाटगे, सभापती अर्थ व शिक्षण समिती यांनी सदर अभियानासाठी सर्व पदाधिकारी यांचा सक्रिय सहभाग असेल असे सांगितले.
  • मा.श्री.रविकांत आडसुळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) यांनी सदर अभियानाचे सादरिकरन करुन संपूर्ण अभियानाचे उद्दिष्ठ व उद्देश याची सविस्तर माहिती सांगितली.
  • श्री.चंद्रकांत सुर्यवंशी, प्रभारी समाजकल्याण अधिकारी यांनी अभियानाचे प्रस्तावीक केले.

याप्रसंगी मा.श्री.सर्जेराव पाटील, उपाध्यक्ष जि.प.कोल्हापूर, मा.श्री.राजेंद्र भालेराव, उपमुख्य कार्यकारी

अधिकारी (ग्रा.पं.), मा.श्री. सोमनाथ रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मबाक) व सन्मा.जि.प.सदस्य उपस्थित होते.

सदर कार्यशाळेसाठी गटविकास अधिकारी (सर्व), तालुका आरोग्य अधिकारी (सर्व), बाल विकास प्रकल्प अधिकारी (सर्व) विस्तार अधिकारी पंचायत (प्रत्येक तालुक्यातून एक) विस्तार अधिकारी आरोग्य (प्रत्येक तालुक्यातून एक) ASSK ब्लॉक मॅनेजर (सर्व) मोठया संख्येने उपस्थित होते.

  • यापुढील टप्पा खालीलप्रमाणे –

जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींची नोंदणी १००% करून ती संकेतस्थळ www.divyangunnatizpkolhapur.com वर online उपलब्ध करणे.

अ.क्र. बाब/मुद्दा कालमर्यादा/ दिनांक जबाबदारी
जिल्हास्तरीय कार्यशाळा दि. 30/06/2018 उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र)

समाजकल्याण अधिकारी

तालुकास्तरीय कार्यशाळा दि. 02/07/2018       किंवा       दि. 03/07/2018 गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पं) विस्तार अधिकारी (आरोग्य)
ग्रामपंचायत स्तरावर कार्यशाळा. दि. 05/07/2018 किंवा  दि. 06/07/2018 ग्रामविकास अधिकारी/ ग्रामसेवक/ आरोग्य सेवक/ सेविका, प्रभाग सचिव
प्रत्यक्ष सर्व्हेचा दिवस दिव्यांग व्यक्तींचे फॉर्म भरणे/ नोंदणी करणे. दि. 07/07/2018 ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी, आशा/ अंगणवाडी सेविका
भरलेले फॉर्म online करणे. दि. 08/07/2018  ते 15/07/2018 ग्रामविकास अधिकारी/ ग्रामसेवक, ASSK केंद्रचालक, प्रभाग सचिव.

“गुरुवार  डास सहांरक दिन  ”  जिल्हा परिषद मुख्य इमारती मध्ये साजरा करणेत आला.

डंख छोटा धोका मोठा (Small Bite Big Threat)

 

    गुरुवार  डास सहांरक दिन   जिल्हा परिषद मुख्य इमारती मध्ये साजरा करणेत आला.

आज दिनांक 28/06/2018 रोजी जिल्हा परिषद कोल्हापूर मुख्य इमारती मध्ये    गुरुवार  डास सहांरक दिन    साजरा करणेत आला त्याकरिता मा.डॉ.कुणाल खेमनार मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.योगेश साळे जिल्हा आरोग्य अधिकारी, इजि.बुरुड कार्यकारी अभियंता बांधकाम, डॉ.सुहास कोरे अति.जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.फारुख देसाई जिल्हा आर.सी.एच. अधिकारी, श्री.एम.एम.पाटील विस्तार अधिकारी आरोग्य तसेच आरोग्य विभागा कडील सर्व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. 

जिल्हा परिषद कोल्हापूर मुख्य इमारतीचा परिसर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली सर्व पाणी साठयाचे सर्व्हेक्षण करण्यात आले, पाणी साठयामध्ये गप्पी फिश टाकणेची कार्यवाही करणेत आली, खडडे असणा-या जागी खडडे मुझवणे कार्यवाही करणेत आली, साचलेल्या पाण्यामध्ये व उघडया टाक्यामध्ये टेमिफॉस टाकणेत आले, मुख्य इमारतीच्या सर्व खोल्यामध्ये धुरफवारणी करणेत आली, उघडयावरील टायरी नष्ट करण्यात आली, अडगळीचा कचरा साफ करण्याची कार्यवाही करणेत आली. जिल्हा परिषद मध्ये सर्व परिसरा मध्ये डास सहांरक मोहिम राबविण्यात आली असुन जिल्हयातील सर्व गांवामध्ये गुरुवार हा डास सहांरक दिनसाजरा करणे बाबत सुचना देणेत आलेल्या आहेत तसेच जिल्हयामध्ये तालुकास्तरीय कार्यशाळाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याचे वेळापत्रक खालील प्रमाणे.

उद्यापासुन तालुकास्तरावरील कार्यशाळा

अ.क्रं. तालुका कार्यशाळा दिनांक वेळ अ.क्रं. तालुका कार्यशाळा दिनांक वेळ
4 2
1 करवीर 05/07/2018 सकाळी 10 7 राधानगरी 02/07/2018 सकाळी 10
2 पन्हाळा 05/07/2018 दुपारी 1.30 8 भुदरगड 02/07/2018 दुपारी 1.30
3 शाहुवाडी 05/07/2018 सांय 4.00 9 गगन बावडा 02/07/2018 सांय 4.00
1 3
4 शिरोळ 29/06/2018 सकाळी 10 10 गडहिग्लज 03/07/2018 सकाळी 10
5 हातकणंगले 29/06/2018 दुपारी 1.30 11 आजरा 03/07/2018 दुपारी 1.30
6 कागल 29/06/2018 सांय 4.00 12 चंदगड 03/07/2018 सांय 4.00


दिनांक  26/06/2018 इ.रोजी  लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू  महाराज यांची 144 वी जयंती साजरी.

धर्मभेद,जातीभेद, अस्पृश्यता आणि निरक्षरता यांच्या विरोधात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेला लढा ऐतिहासिक असून कोल्हापूर नगरीला या राजाच्या कार्यकतृत्वाचा वसा आणि वारसा लाभला हे कोल्हापूर जिल्हयांचे भाग्य आहे. असे उद्गगार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शौमिका महाडिक यांनी लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती  यांच्या 144 व्या जयंती निमित्त्य कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये आयोजित कार्यक्रमांत काढले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी राजर्षी शाहूनी स्त्री शिक्षण,बहुजन समाजाचे शिक्षण,कृषी, व्यापार जलसंधारण या क्षेत्रात दुरदृष्टीने घेतलेल्या निर्णयाची माहिती सभागृहाला विषद केली . या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. इंद्रजित देशमुख यांनी राजर्षी शाहूचे कार्य आणि त्याच्या जीवनातील विविध प्रसंग सांगून सभागृहाला मंत्रमुग्ध्‍ केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस जिल्हा परिषेदेचे अध्यक्ष मा.सौ.शौमिका महाडिक यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करणेत आला.  या प्रसंगी समाजकल्याण सभापती मा.श्री. विशांत महापूरे, , उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) श्री.रविकांत आडसुळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) श्री.राजेंद्र भालेराव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. संजय राजमाने, प्रकल्प संचालक,जिग्रावियं श्रीम.सुषमा देसाई, कार्यकारी अभियंता (बांधकाम) श्री.तुषार बुरुड, जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री.चंद्रकांत सूर्यवंशी, पशुसंवर्धन अधिकारी श्री.एस.एच.शिंदे, यांच्यासह व सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.

यावेळी प्रा.संजय लोंढे  यांनी मान्यवरांचे स्वागत व आभार व्यक्त केले. तसेच कुमारी अपेक्षा सकटे या इ.2 री च्या  बालिकेने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विषयी अप्रतिम मनोगत व्यक्त केले. याप्रंसगी अधिकारी, कर्मचारी संघटना प्रतिनिधी व कर्मचारी  मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी सर्व जिल्हा परिषद  कर्मचारी संघटनेच्या वतीने रक्तदान,रांगोळी व विद्युत रोषणाई केल्यामुळे कार्यक्रमांला महोत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले होते.

 

 

(रविकांत आडसुळ)

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)

                                                                                     जिल्हा परिषद, कोल्हापूर

प्लॅस्टिक बंदी जिल्हास्तरीय कार्यशाळा

प्लॅस्टिक बंदी अंमलबजावणीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी कटीबध्द रहावे : नंदकिशोर गांधी

(जिल्हा स्तरीय प्लॅस्टिक बंदी अधिसूचना अंमलबजावणी कार्यशाळा संपन्न)

कोल्हापूर :  दि. 21.06.2018  

      प्लॅस्टिक बंदीबाबत ग्रामीण भागात जनजागृतीसोबतच अधिसूचनेतील  नियमांची काटेकोर अंमजबजावणी करणे आवश्यक असल्याचे मत पर्यावरण तज्ञ नंदकिशोर गांधी यानी जिल्हा परिषद कार्यशाळेत व्यक्त केले. लोककला केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे झालेल्या प्लॅस्टिक व थर्माकोल बंदी कार्यशाळेत ते बोलत होते.

या कार्यशाळेसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा. सौ. शौमिका महाडीक, अर्थ व शिक्षण समिती सभापती मा. श्री. अंबरिश घाटगे, पुणे विभागाचे उपायुक्त (विकास) मा. श्री. चंद्रकांत गुडेवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. डॉ. कुणाल खेमनार, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. इंद्रजित देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. रविकांत अडसूळ, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य मा. श्रीम. सुषमा देसाई आदी उपस्थित होते.

मागील 15 वर्षापासून महाराष्ट्रात विविध योजनांव्दारे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या विषयावर काम सुरू आहे. शहरी व ग्रामीण भागातही प्लॅस्टिक वापर मोठया प्रमाणात वाढल्याने 23 मार्च, 2018 रोजी महाराष्ट्र शासनाने अधिसूचना काढून महाराष्ट्रात प्लॅस्टिक व थर्माकोलवर बंदी घातली. या अधिसूचनेबाबत लोकांना माहिती व्हावी तसेच अंमलबजावणी यंत्रणेला अधिसूचनेच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करणेसाठी जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत सर्व तालुकयांचे गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि ग्राम पंचायतींचे ग्रामसेवक अशा एक हजार प्रशिक्षणार्थींची कार्यशाळा घेणेत आली.

या वेळी गांधी यांनी प्लॅस्टिक  वापराबाबत कायदे-नियम, त्याचे तोटे, पर्यावरणावरील दुष्परिणाम, प्लॅस्टिकला पर्याय या विषयांवर मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले आज वस्तूंच्या वेष्टनापासून ते अगदी हृदयाच्या कृत्रिम झडपांपर्यंत प्लॅस्टिकचा वापर होत आहे. पण तरीही मुळ वैज्ञानिक दृष्टीकोन जपून पर्यावरणाला धक्का पोहोचणार नाही या पध्दतीने प्लॅस्टिकचा वापर केला पाहीजे. त्यामुळे प्लॅस्टिकपासून पर्यावरणाला, आरोग्याला निर्माण झालेला धोका याबाबतची माहिती सर्वांना द्यावी लागेल आणि यासाठी शासनाच्या प्लॅस्टिकबंदी अधिसूचनेची अंमलबजावणी शंभर टक्के करावी. यानंतर मा. श्री. मिलिंद पैजार यांनी प्लॅस्टिक आणि त्याचा मानवी शरीरावर होणार घातक परिणाम याबाबत उपस्थितांना माहिती दिली. या सादरीकरणा दरम्यान विविध लघुचित्रफिती दाखविण्यात आल्या. तसेच या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले कोल्हापूरचे श्री. सचिन पाटील हे मागील 8 वर्षे ते आपल्या ग्राहकांना प्लॅस्टीक पिशवी न देता व्यवसाय करीत असल्याचे सांगितले व त्यांचे अनुकरण करणेसाठी आवाहन केले.

यावेळी उपायुक्त मा. श्री. चंद्रकांत गुडेवार यांनी प्लॅस्टिक व थर्माकोल बंदी अधिसूचना अंमलबजावणीबाबत माहिती दिली. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी या अधिसूचनेची अंमलबजावणी  कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत यशस्वीरित्या केली जाईल याबाबत आश्वासन दिले.

कार्यशाळेसाठी उपस्थित सर्वांना महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेच्या प्रती तसेच नंदकिशोर गांधी यांच्या प्लॅस्टिक या विषयावर आधारित माहिती पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. कार्यशाळेला उपस्थित मान्यवरांचे आभार मा. श्री. राजेंद्र भालेराव, उपमुख्य कार्यकारी आधिकारी (ग्रा.पं.) यांनी व्यक्त केले तर कार्यशाळेचे नियोजन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत करण्यात आले.