स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत ‘स्वच्छता रथ’ उदघाटन व ‘स्वच्छता संवाद’ उपक्रमाचे आयोजन

कोल्हापूर : 27.09.2021

स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अतर्गंत “‍स्वच्छता ही सेवा “‍ अभियान दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेचे विविध उपक्रम राबविणेत येत आहेत.
या अभियानअंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे स्व्‍च्छता रथाचे उदघाटन कार्यक्रम आणि गाव स्तरीय यंत्रणेसोबत स्वच्छतेचे सातत्य, स्वच्छतेची शाश्वतता राखण्यासाठी तसेच हागणदारीमुक्त्‍ गाव अधिकच्या (ODF +) अनुषंगाने ऑनलाईन स्वच्छता संवाद उपक्रम संपन्न्‍ झाला.स्वच्छता रथाचे उदघाटन मा. ना. हसन मुश्रीफ, मंत्री ग्रामविकास व कामगार, महाराष्ट्र राज्य , मा. ना. सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री, गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य व माजी सैनिक कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री महोदय कोल्हापूर यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न्‍ झाले.
यानंतर जिल्हयाचे पालकमंत्री मा. ना. सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांनी ऑनलाईन ‘स्वच्छता संवाद’ उपक्रमांतर्गत जिल्हयातील गावस्तरीय यंत्रणेसोबत स्वच्छता विषयक संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कोल्हापूर जिल्हा हागणदारीमुक्त आहेच आता तो हागणदारीमुक्त अधिक करण्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे असून, यासाठी गावस्तरावर स्वच्छता, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे आणि ग्रामीण जनतेला 55 लि. प्रति माणसी प्रमाणे पाणीपुरवठा ही कामे प्राधान्याने करणेचे आवाहन केले. तसेच, ग्राम पंचायतींनी स्वच्छतेचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन संदर्भात भविष्याच्या दृष्टिने संबंधित गावातील तरंगती लोकसंख्येचा ही (फ्लोटींग पॉप्युलेशन) विचार करावा. गावातील पारंपारिक नदी, नाले, ओढे यांची रूंदी पूर्ववत करावी. तसेच येत्या 1 तारखेला ज्येष्ठ नागरिक दिन आहे. या दिनाचे औचित्य साधून संबंधित गावातील ज्येष्ठ नागरिकांचे 100 टक्के लसीकरण कसे होईल, याबाबत सरपंचांनी ठोस नियोजन करावे,अशा सूचना मा.पालकमंत्री यांनी दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. श्री. राहुल पाटील, अध्यक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी केले व स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत देशात जिल्हा अव्वल करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देण्याबाबत आवाहन केले.
या उपक्रमासाठी मा. आमदार श्री. राजेश पाटील, मा. श्री. राहुल पाटील, अध्यक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूर, मा. श्री. जयवतंराव शिंपी, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, कोल्हापूर, मा.सौ. रसिका पाटील, सभापती, अर्थ व शिक्षण समिती, जि. प. कोल्हापूर, मा. सौ. शिवानी भोसले, सभापती, महिला व बालकल्याण समिती, जि.प. कोल्हापूर, मा. श्री. अजयकुमार माने, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. कोल्हापूर, मा. श्री. शंकर जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर, मा. श्री. अरूण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं), जि. प. कोल्हापूर, मा. श्रीम. प्रियदर्शिनी मोरे, प्रकल्प संचालक, (जल जीवन मिशन), जि. प. कोल्हापूर उपस्थित होते.
ऑनलाईन स्वच्छता संवाद कार्यक्रमांतर्गत जिल्हयातील मा.जिल्हा ‍परिषद सदस्य, मा. पंचायत समिती सभापती, मा. पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी ‍ सेविका, स्वच्छाग्रही अशा सुमारे 10,192 लोकांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला. स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत हागणदारीमुक्त गाव अधिक, स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण- 2021, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या विषयावर स्वच्छतासंदेश देणारा स्वच्छता रथ हा जिल्हयातील गावांमध्ये फिरणार आहे. स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत ग्राम पंचायत स्तरावर स्वच्छता श्रमदान, प्लास्टीक संकलन, स्वच्छता रॅली, स्वच्छता शपथ, स्वच्छता घोषवाक्य लेखन स्पर्धा असे विविध उपक्रम राबविणेत येत आहेत.