जिल्हा परिषदेकडून राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान  2020-21 अंतर्गत विविध प्रशिक्षणÛúÖµÖÔÛÎú´ÖÖÓ“Öê आयोजन केलेबाबत कोल्हापूर-03/11/2020.

 

पंचायत राज संस्थामधील लोकप्रतिनिधी व अधिकारी / कर्मचारी यांची कार्यक्षमता वाढावी आणि या संस्थांचे कामकाज अधिक परिणामकारकरित्या होण्याच्या दृष्टिने तसेच ग्रामपंचायतींना उपलब्ध असणारा निधीचा स्त्रोत व केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचे अभिसरण करुन ग्रामपंचायत विकास आराखडा परिपूर्ण होण्याच्या दृष्टिने राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत सन 2020-21 च्या मंजूर वार्षिक आराखड्यामधील विविध प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा परिषद कोल्हापूर यांचेमार्फत करणेत येणार आहे.

यामध्ये मा. जिल्हा परिषद सदस्य यांचे एक दिवसीय प्रशिक्षण (67), जिल्हा परिषद खातेप्रमुख व जिल्हा स्तरावरील राज्य शासनाचे विविध विभागाचे विभागप्रमुख यांचे एक दिवसीय प्रशिक्षण (20),  तालुकास्तरीय छाननी समिती सदस्य यांचे एक दिवसीय प्रशिक्षण (120),  प्रभारी अधिकारी (विस्तार अधिकारी) यांचे 2 दिवसीय प्रशिक्षण (134), पर्यवेक्षिका (एबाविसेयो) यांचे 2 दिवसीय प्रशिक्षण (134) सरपंच व ग्राम सेवक  यांचे 2 दिवसीय प्रशिक्षण (1888), पंचायत समितीचे अधिकारी व पदाधिकारी यांचे एक दिवसीय प्रशिक्षण (600), गणातील सर्व ग्रा पं सदस्य, ग्रामस्तरीय संसाधन गटाचे सर्व सदस्य व सर्व विभगांचे (जिप व राज्य शासन) ग्राम स्तरावरील सर्व कर्मचारी यांची एक दिवसीय कार्यशाळा (16500), गणातील सर्व ग्रामपंचायतमधील स्वयंसहाय्यता गटांच्या ग्रामसंघाचे अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष, अंगणवाडी सेविका, ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य आणि समुह संसाधान व्यक्ती (CRPs) यांची एक दिवसीय कार्यशाळा (15450) इ. प्रशिक्षण कार्यक्रमांचा समावेश आहे.

सदर प्रशिक्षण कार्यक्रम ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था, कसबा बावडा आणि ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांचेमार्फत पूर्ण केले जाणार आहेत.

उपरोक्त नमुद प्रशिक्षण कार्यक्रमापैकी प्रभारी अधिकारी (विस्तार अधिकारी) यांचे प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 04/11/2020 ते दिनांक-07/11/2020 या कालावधीत तसेच पर्यवेक्षिका (एकाविसेयो) यांचे प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक-09/11/2020 ते 12/11/2020 ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था कसबा बावडा कोल्हापूर येथे आयोजित करणेत आलेले आहेत.

 

 

पंचगगा नदी प्रदूषण मुक्ती संदर्भात ग्रा. प. नृसिंहवाडी येथे श्रमदान

नमामि पंचगगा उपक्रमांतर्गत पंचगगा नदी प्रदूषण मुक्ती संदर्भात ग्रा. प. नृसिंहवाडी येथे श्रमदान करण्यात आले यावेळी मा.शौमिका  महाडिकसो अध्यक्ष जि प कोल्हापूर, मा. अमन मित्तलसो, मु.का.अ. जि प कोल्हापूर, मा. प्रियदर्शिनी मोरे, उप मु.का.अ. मा. अर्चना चौगले,सभापती, मा.परवीन पटेलजि.प.सदस्य .मा. रूपाली मगदुम पं.स.सदस्य. मा. विजयसिंह जाधव, गट विकास अधिकारी. तालुका आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी(पं) अंगणवाडी  पर्यवेक्षिका, ग्रामसेवक/ग्राम विकास अधिकारी सरपंच, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य, ग्रा.प.कर्मचारी, आंगणवाडी सेविका व ग्रामस्थ इ. उपस्थित होते.

स्वच्छ व पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासन सज्ज (उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषदेसोबत महसूल विभाग ही सहभागी होणार )

स्वच्छ व पर्यावरणपुरक गणेशोत्सव -2017 साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय,कोल्हापूर येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी मा.श्री.अविनाश सुभेदार,जिल्हाधिकारी,कोल्हापूर ,मा.डॉ.कुणाल खेमनार,मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.कोल्हापूर उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्हयामध्ये वर्ष 2015-16 पासून पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याचा उपक्रम सुरू झाला.या उपक्रमाचे आता चळवळीमध्ये रूपांतर झाले असून कोल्हापूर जिल्हयातील नागरिकांनी पर्यावरण रक्षण आणि पंचगंगा प्रदूषणाचे गांर्भीय लक्षात घेवून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आहे. या उपक्रमाच्या माध्यामातून वर्ष 2015-16 मध्ये 182442 इतक्या मूर्तींचे संकलन करण्यात आले तर 916 ट्रॉली निर्माल्य दान करण्यात आले.तसेच वर्ष 2016-17 मध्ये देखील 235889 इतक्या मूर्तींचे संकलन करण्यात आले आणि 1322 ट्रॉली निर्माल्य दान करण्यात आले.

या वर्षी ही दि.25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर,2017(घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव) मध्ये होणा-या गणेशोत्सवासाठी देखील याचं पध्दतीने  स्वच्छ व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा,यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यापूर्वी जिल्हा परिषदेमार्फत हा उपक्रम राबविला जात होता यावर्षी महसूल विभागाने ही सक्रिय घेवून अभियान यशस्वी करावे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले तर  ü कोणताही जलस्त्रोत प्रदुषित होणार नाही यासाठी  पंचगंगा प्रदुषणांतर्गत येणा-या गावांसोबत इतर सर्व गावांमध्ये ही एक गावं,एक गणपती(सार्वजनिक गणेशोत्सव) संकल्पना राबविणे,ग्रामस्थांना शाडूच्या गणेशमुर्तीं घेण्याबाबत आवाहन करणे,निर्माल्य नदीत विसर्जन न करणे आणि गणेश मूर्ती संकलन  याबाबत ग्रामस्तरावर प्रबोधनासाठी गृहभेटींचे आयोजन करणे, संकलित मूर्ती कुंभारांनी परत घेण्याबाबत आवाहन करणे,गणेशमूर्ती विसर्जनासाठी व निर्माल्य विसर्जनासाठी ग्रामस्तरावर पर्यायी  ü व्यवस्था उपलब्ध करणे याबाबत गावनिहाय नियोजन करणेबाबत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थितांना सूचना दिल्या.

या नियोजन बैठकीसाठी उपविभागीय अधिकारी,उपविभाग,गट विकास अधिकारी,गटशिक्षणाधिकारी,तहसिलदार,उपअभियंता,(ग्रा.पा.पु.) गट समन्वयक जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील तज्ञ,सल्लागार उपस्थित होते.

———————————————————————————————

उपमुख्य कार्यकारी अधिकारी,(पा.व स्व.)

जिल्हा परिषद,कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा व इतर कार्यक्रमासाठी चहा नाश्ता व जेवणाचे दर निश्चित करणेसाठी दरपत्रक प्रसिद्धी करणेबाबत

महाराष्ट्र राज्य  ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत प्रशिक्षण  कार्यशाळा व इतर कार्यक्रमासाठी चहा नाश्ता व जेवणाचे दर निश्चित करणेसाठी दरपत्रक प्रसिद्धी  करणेबाबत 

महिलांसाठी आरोग्य शिबीर

कोल्हापूर जिल्हा परिषद, महादेवराव महाडिक फौंडेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र कणेरी, ग्रामपंचायत मोरेवाडी, रंगनाथ हॉस्पीटल, तसेच देवराई संस्था यांचे संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आरोग्य शिबीर ग्राम पंचायत मोरेवाडी येथे आयोजित करणेत आले होते. महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबीराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सौ.शौमिका अमल महाडिक यांचे शुभ हस्ते करणेत आले. महिला ही सतत घरातील इतरांसाठी राबत असते. जोपर्यंत मोठा  आजार होत नाही तोपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे कानाडोळा करीत असते. ही मानसिकता महिलांनी आता बदलली पाहिजे व महिलांनी सर्वप्रथम स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. हे आरोग्य शिबीर आयोजित करण्यामागचा मूळ हेतू असा होता की, काही प्राथमिक आजार हे पहिल्या टप्प्यातच निदर्शणास यावेत यासाठी विविध ठिकाणी या पुढेही महिलांचे आरोग्य शिबीरांचे आयोजन करणेत येणार आहे याचा सर्व महिलांनी  लाभ घेणेत यावा असे आवाहन मा.अध्यक्ष सौ. शौमिका महाडिक यांनी या प्रसंगी केले.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नलवडे, डॉ. प्रविण हेंद्रे, डॉ. सौ. अनुराधा सामंत, करवीरचे प्र.गट विकास अधिकारी श्री. भोसले, श्री. दत्तात्रय भिलुगडे, सौ.स्मिता हुदले, श्री. मनोज बागे, श्री. आशिष पाटील, आरोग्य सहाय्यक कर्मचारी व मोरेवाडी भागातील मोठया प्रमाणात महिला उपस्थित होत्या.

 

 

पंचगंगा प्रदूषण व सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन संबधी जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे मा. अध्यक्ष जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली बैठक.

दि.10/8/2017 रोजी पंचगंगा प्रदूषण व सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन संबधी जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे मा. अध्यक्ष जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदरच्या सभेस मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी,(पा.व स्व.) जिल्हा परिषद, कोल्हापूर सर्व तालुक्याचे गटविकास अधिकारी व सर्व उपविभागाचे उप अभियंता, सर्व तालुक्याचे गट संसाधन केंद्र प्रतिनिधी उपस्थित होते. सदरच्या बैठकीचे प्रास्ताविक व बैठकीचे उद्देश मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पा. व स्व.) यांनी विशद केला. सदरच्या बैठकीचे कार्यवृत्तांत पूढील प्रमाणे.

  1. प्रपत्र अ ब क व ड प्रमाणे सर्व्हेक्षण कामकाजाचा आढावा घेतला असता यापैकी करवीर व भूदरगड यांचेकडील सर्वाधिक ग्रामपंचायतींचा सर्व्हेक्षण अहवाल अप्राप्त आहे. याबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदरचा सर्व्हेक्षण तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
  2. सर्व्हेक्षण पूर्ण झालेल्या ग्रामपंचायतींचे अंदाजपत्रक तातडीने पूर्ण करावे यासाठी शासन निर्णयास अनूसरून अंदाजपत्रक तयार करावीत यासाठी शासन निर्णयाचे वाचन करण्यात आले. तसेच वैयक्तिक स्तरावरील शोषखड्डे व खतखडे्‌डे कामे नरेगा योजनेतून प्रस्तावित करावीत.
  3. गटविकास अधिकारी पन्हाळा व कागल यांनी नरेगा योजनेतून वैयक्तिक शोषखडा कामे घेण्यासाठी सूधारित आराखड्यास मंजूरी मिळणेबाबत मागणी केली.
  4. शाहूवाडी गटविकास अधिकारी यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील वैयक्तिक पातळीवरील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठीच्या उपाययोजना नरेगा योजनेतून प्रस्तावित असल्याबाबतचा आढावा दिला.
  5. हातकंणगले गटविकास अधिकारी यांना नाबार्ड प्रकल्पासाठी जागा मागणीचे प्रस्ताव जिल्हा परिषद मार्फत मा. जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचना दिल्या.
  6. घनकचरा व्यवस्थापन बाबत विविध पर्यांयाची पडताळणी व माहिती घेणेबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचित केले. तसेच SLRM साठी पोश्टर व लोगो तयार करण्याबाबत सूचित करून त्याबाबतच्या नवीन कल्पना असल्यास जिल्हास्तरावर सादर करण्याबाबत सूचित केले.
  7. गडहिंग्लज गटविकास अधिकारी यांनी सांडपाणी व्यवस्थापनासाठी पाणी वहनासाठी गटर आवश्यक असल्याचे सूचित केले त्यावर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बंदिस्त गटारांचा बृहत आराखडा तयार करण्याबाबत सूचित केले.
  8. उपअभियंता आजरा यांना उत्तुर ग्रा.पं. साठी बक्षिस रक्कमेतून वैयक्तिक शौषखड्डे करणेबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचित केले.
  9. सर्व उपअभियंता व गटविकास अधिकारी यांना जिल्ह्यातील क वर्ग पर्यटन स्थळ असणाऱ्या ग्रा.पं. च्या सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाबाबत विशेष लक्ष देण्याबाबत सूचित केले.
  10. राधानगरी उपअभियंता यांनी 8765 शोषखड्डे नरेगा योजनेतून प्रस्तावित केलेची माहिती दिली. तसेच घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध होत नसल्याचे नमूद केले यावर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जास्तीत जास्त वैयक्तिक स्तरावरील उपाययोजना करणे व जागा उपलब्धतेचे सूक्ष्म नियोजन करण्याचे सुचित केले.
  11. तसेच पंचगंगा प्रदूषित न होण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत त्याचा सविस्तर अहवाल उप अभियंता यांनी सादर करण्याबाबत सूचित केले.
  12. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व गटांनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन बाबत आराखडे तयार करीत असताना निधीच्या मर्यादेत न राहता बृहत आराखडा तयार करावा व त्यानंतर सर्व योजनांचा convergence करून कामे पूर्ण होतील असे नियोजन करावे.
  13. मा. अध्यक्षा यांनी सर्व तालुक्यांनी भौगोलिक परिस्थितीनूसार नाविण्यपूर्ण काम करण्याबाबत सूचना केल्या तसेच SLRM बाबत गाव पातळीवर सर्व घटकांचा सहभाग घेण्यासाठी प्रबोधन करण्यासाठी विशेष उपक्रम राबविणेबाबत सूचित केले. तसेच याबाबत काम करीत असताना शासन सुचनांच्या पलीकडे जावून आदर्श काम करून लोकांची मानसिकता बदलण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात यावे.

वरील प्रमाणे मुद्दयांची सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पा.व स्व.) यांनी आभार व्यक्त करून सभा संपलेचे जाहिर केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद, कोल्हापूर.

जि.प. चा स्तुत्य असा ‘‘ पसायदान उपक्रम ’’

शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता ही त्रिसुत्री समाज विकासासाठी अत्यंत मुलभुत असुन त्याची पुर्तता करणेसाठी जि.प. च्या प्रयत्नांना आपल्या मदतीचे पाठबळ द्यावे आणि समाजऋणातून मुक्त होणेची संधी साधावी असे भावनिक आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शौमिका महाडीक यांनी CSR च्या बैठकीच्या वेळेस केली. निमित्त होते – जिल्हा परिषदेच्या राजर्षि शाहु सभागृहामध्ये ‘‘ CSR- उद्योजक सामाजिक उत्तरदायित्व ’’ च्या अनुष्‌ंगाने जि.प. मार्फत करणेत आलेली  ‘‘ पसायदान उपक्रमाची  ’’  सुरवात.

जिल्हा श्रेत्रात विविध विकासकामे, उपक्रम राबविताना शासन तथा जि.प. स्तरावरून निधी मिळणेकरिता अनेक मर्यादा असतात. तेव्हा ही तफावत दुर करणेसाठी विविध उद्योग, बँक तथा औद्योगिक निगम यांचेकडून CSR अंतर्गत निधी मिळवून त्यातून सामाजिक बांधिलकिची जपणूक करण्यासाठी एकूण 34 उद्यागसमुह तथा बँकांचे प्रतिनिधी या कार्यक्रमास उपस्थित होते.

समाजातील शेवटच्या घटकांना विकासाचा लाभ मिळवून देण्यासाठी CSR-उद्योजक सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून प्रत्याक्षात आर्थिक पाठबळ देण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी या प्रसंगी केले. पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा व स्वच्छाता विभाग तथा ग्राम पंचायत विभागामार्फत अपेक्षित उपक्रमांचे प्रेजेंटेशन करणेत आले. त्यावेळी इंडोकाउंट फाऊंडेशनचे श्री. देशपांडे यांनी 20 शाळांची जबाबदारी स्विकारली. आर. बी. एल. व आय. सी. आय. सी. आय. बँकेने डिजिटल ग्राम निर्मिती करीता योगदान देणेबाबत सुतोवाच केले. तर गोकुळ दुध संघामार्फत पश्‌ुसंवर्धन विभागाला व्हॅन देणेबाबत अभिवचन देणेत आले. या प्रसंगी घाटगे पाटील इंडस्ट्रिजचे श्री गिरीष श्रीखंडे, तसेच कॅनरा बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते. जि.प. कडील मक्तेदार श्री विजय भिके यांनी विद्यानिकेतन क्रिडा प्रशालेस पोषण आहार पुरविणार असलेचे सांगितले. एकूण सामाजिक भान व बांधिलकी जपणारा हा उपक्रम ‘‘ו֣Öê कमी तिथे †Ö´Æüß’’ ही भुमिका पार पाडणारा असलेने त्यास ‘‘¯ÖÃÖÖµÖ¤üÖ­Ö उपक्रम ’’†ÃÖê आभार प्रदर्शन करताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबोधले.

या कार्यक्रमास जि.प.च्या अध्यक्षा सौ. शौमिका अमल महाडिक मॅडम, उपाध्यक्ष              श्री सर्जेराव ज्ञानदेव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त            मुख्य कार्यकारी अधिकारी श्री इंद्रजीत देशमुख, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. संजय राजमाने, अर्थ व शिक्षण समिती सभापती श्री अंबरिषसिंह संजय घाटगे, समाजकल्याण समिती सभापती  श्री विशांत सुरेश महापुरे तसेच पक्षप्रतोद श्री विजय जयसिंग भोजे, भाजप गटनेते श्री अरूणराव जयसिंगराव इंगवले तसेच खातेप्रमुख उपस्थित होते.

शाळा निर्लेखन जाहिर लिलावाबाबत

 

संक्षिप्त माहिती शाळा निर्लेखन जाहिर लिलावाबाबत            

प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत खालील नमूद केलेल्या तालुकयामधील शाळा निर्लेखन करावयाच्या आहेत. संबधित लिलाव नोटीस व लिलावापासूनची सर्व कार्यवाही तालुकास्तरावरून होणार आहे. यासाठी लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घेणाऱ्यांनी तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी पं. स., गटविकास अधिकारी पं. स, व उपअभियंता (बांधकाम ) पं. स.यांचेशी संपर्क साधावा.

 

अ.न. गटाचे नाव शाळेचे नांव निर्लेखन करावयाच्या शाळा खोली संख्या सरकारी किंमत एकूण तालुनिहाय सरकारी किंमत
1 करवीर वि.मं.कुमार गांधीनगर 3 व स्ंाधिी कुमार गांधीनगर   ता. करवीर  

09

 

39,110/-

 

39,110/-

संबधित गटशिक्षणाधिकारी, उपअभियंता (बांधकाम), गटविकास अधिकारी यांनी इकडून प्रसिध्द केलेल्या दिनांकानंतर एक महिन्यामध्ये शासन नियमांनुसार लिलाव प्रक्रिया पूर्ण करणेची आहे.

 

                                                   sd/-                                                 

                                     मुख्य कार्यकारी अधिकारी                               

                                      जिल्हा परिषद, कोल्हापूर